अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षण विषय घेत लोकांची दिशाभूल करायची हे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी ते आंदोलन करत आहेत, 5 राज्यातील निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी हे सर्व काही सुरू आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षणाच्या आडून भाजपकडून सर्व राजकारण सुरू आहे. हे सर्व जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. बारामतीमध्ये सांगता सभा आहे तिथे आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत, ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. भाजप जनतेची दिशाभूल करतंय अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अडीच वर्षांपूर्वी 2023 मध्येच महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे हे बिल पास झाले. पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही, यावर भाजप काहीही बोलत नाही. 543 सदस्यांच्या संसदेत हे आरक्षण द्यायला हवे होते. पण त्यांवर काही कारवाई झाली नाही. भाजपकडून केवळ जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे. काही जणांचे तर म्हणणे आहे की 33 नाहीतर 50 टक्के आरक्षण करा. 2023 मध्ये सर्वांनी मतदान केले अनिल देशमुख म्हणाले की, 2023 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आम्ही सर्वांनी या बिल पास व्हावे यासाठी मतदान केले पण भाजप या बिलाच्या नावाने राजकारण करत आहे. महिलांना आरक्षण मिळावे यासाठी सर्वांचा पाठिंबा आहे. शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना आरक्षण कधीच दिले आहे. भाजपकडून केवळ या गोष्टीचे राजकारण सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी पास झालेल्या विधेयकाची अजून नोटीफिकेशन काढण्यात आले नाही, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे. विरोधकांनी कधीही महिला आरक्षण विधेयक पाडले नाही विरोधकांकडून महिला आरक्षणासंदर्भातील कोणतेही विधेयक पाडण्यात आलेले नाही. भाजपमधील एका गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरुन घालवायचे आहे, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहे का हे मला माहिती नाही. मोदी गेल्यानंतर देशाची सत्ता आपल्याकडे रहावी यासाठी 850 सदस्य करण्याचे डिलिमीटेशन बिल आणण्यात आले, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
महिला आरक्षणावरून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे:अडीच वर्षांपूर्वी बिल पास होऊनही अंमलबजावणी का नाही? अनिल देशमुखांचा भाजपला सवाल
-
By सुरेश पाचभाई
- April 21, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
औंढ्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला शिवागीळ:पदोन्नतीवरून झाला वाद,...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 21, 2026
देश तुम्हाला बेकारांचा कारखाना करायचा का?:उद्धव ठाकरे...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 21, 2026
रितेश-जिनेलियाच्या ‘राजा शिवाजी’ची सर्वत्र चर्चा:मुलगा राहिल देशमुखही...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 21, 2026
तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट:चित्रा वाघ यांची रोहिणी...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 21, 2026
