ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

हिवरा शिवारात विजेचा थरारक कहर!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वीज पडून गोरा अन् बैल ठार; अल्पभूधारक शेतकऱ्यावर दुहेरी संकट

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील हिवरा शेतशिवार गुरुवारी (दि. 28 मे) सायंकाळी विजांच्या प्रचंड कडकडाटाने अक्षरशः हादरून गेले. अचानक कोसळलेल्या विजेने एका अल्पभूधारक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून, शेतात बांधून ठेवलेला गोरा व बैल जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे शेतकरी मंगल जनार्धन खिरटकर (रा. चोपण) यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगल खिरटकर यांनी स्वतःच्या अवघ्या 3 एकर शेतीसोबतच मक्त्याने आणखी 5 एकर शेती घेत यंदाच्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी ठेक्याच्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाखाली गोरा व बैल बांधलेले होते.अचानक आकाशातून वीज कोसळताच दोन्ही जनावरे क्षणार्धात मृत्युमुखी पडली.घटनेनंतर शिवारात एकच खळबळ उडाली.

शेतकऱ्याने घटनास्थळी धाव घेतली असता गोरा व बैल मृत अवस्थेत दिसून आले. या जनावरांच्या मृत्यूमुळे खिरटकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून, खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतीची सर्व मदार असलेली जनावरे गेल्याने पुढील शेतीकामांचे मोठे संकट उभे ठाकले आहे.विशेष म्हणजे, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज व मक्त्याच्या भरोशावर शेतीची मशागत सुरू केली होती.

मात्र, निसर्गाच्या अवकृपेने काही क्षणातच त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर