Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
सावधान! वीज चमकताना त्वरित उकिडवे बसा:वीज चमकताना डोक्याचे केस उभे राहिल्यास खबरदारी घ्या, हवामान विभागाचा ‘अलर्ट’ | रुग्णांची आर्थिक लुट झाल्यास गंभीर परिणाम:शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले | नीट परीक्षेसाठी वायू दलाचा वापर हा मूर्खपणा:हवाई दल राष्ट्रीय सुरक्षेसाठी, भाजपच्या नाकर्तेपणाची भरपाई करण्यासाठी नव्हे – आंबेडकर | मोठी बातमी:शरद पवारांचा एक फोन अन् पुण्यात उमेदवारी फायनल; विधान परिषदेसाठी श्रीकांत पाटील मैदानात, पवारांचा मास्टरस्ट्रोक | सेनगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले:दोन जणांवर गुन्हा दाखल; 7.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
SP News Maregaon
हिवरा शिवारात विजेचा थरारक कहर!

हिवरा शिवारात विजेचा थरारक कहर!

19 hours पूर्वी · 1 min read

वीज पडून गोरा अन् बैल ठार; अल्पभूधारक शेतकऱ्यावर दुहेरी संकट

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील हिवरा शेतशिवार गुरुवारी (दि. 28 मे) सायंकाळी विजांच्या प्रचंड कडकडाटाने अक्षरशः हादरून गेले. अचानक कोसळलेल्या विजेने एका अल्पभूधारक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून, शेतात बांधून ठेवलेला गोरा व बैल जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे शेतकरी मंगल जनार्धन खिरटकर (रा. चोपण) यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगल खिरटकर यांनी स्वतःच्या अवघ्या 3 एकर शेतीसोबतच मक्त्याने आणखी 5 एकर शेती घेत यंदाच्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी ठेक्याच्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाखाली गोरा व बैल बांधलेले होते.अचानक आकाशातून वीज कोसळताच दोन्ही जनावरे क्षणार्धात मृत्युमुखी पडली.घटनेनंतर शिवारात एकच खळबळ उडाली.

शेतकऱ्याने घटनास्थळी धाव घेतली असता गोरा व बैल मृत अवस्थेत दिसून आले. या जनावरांच्या मृत्यूमुळे खिरटकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून, खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतीची सर्व मदार असलेली जनावरे गेल्याने पुढील शेतीकामांचे मोठे संकट उभे ठाकले आहे.विशेष म्हणजे, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज व मक्त्याच्या भरोशावर शेतीची मशागत सुरू केली होती.

मात्र, निसर्गाच्या अवकृपेने काही क्षणातच त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!