ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

मनाची शांतता केवळ भगवंताच्या नामातच…:ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांचे निरुपण, पैशाने भौतिक सुख मिळते‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आजच्या युगात माणसाकडे धनदौलत, सौंदर्य, उच्च शिक्षण आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य असले, तरी जर मनात घमेंड असेल, तर तो कधीही भगवंताचे नाम घेऊ शकत नाही. दुर्योधनासारखा अहंकार बाळगणाऱ्यांचा नाश निश्चित असतो, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. पैसा तुम्हाला भौतिक सुख-साधने मिळवून देईल, मात्र शाश्वत सुख आणि मनाचे समाधान केवळ भगवंताच्या भक्तीतच मिळू शकते, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते भाविकांशी संवाद साधत होते. या प्रसंगी इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, मगनभाई पटेल, अशोक कानडे, मदन कांबळे, राजूभाई पटेल, मिलिंद चवंडके आणि डॉ. अंजली फाटके आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महाप्रसाद सेवेबद्दल अॅड. कुंदा दांगट यांचा ग्रंथ भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. रेवतीनंदन दास यांनी व्यावहारिक उदाहरणे देत पैशाची मर्यादा स्पष्ट केली. ते म्हणाले, भरपूर पैसे असणाऱ्या व्यक्तीसमोर उत्तम पक्वान्नाचे ताट असूनही मधुमेहामुळे (डायबिटिस) ती खाऊ शकत नाही. सर्व सुख-साधने उपलब्ध असूनही रात्रीची शांत झोप विकत घेता येत नाही. गंगास्नान केल्याने माणसाची पापे नक्कीच नष्ट होतात, परंतु मनातील पापवृत्ती नष्ट होत नाही. गीता आणि भागवत ग्रंथ हे माणसाच्या मनातील पापवृत्तीचा मुळापासून नाश करून परम पवित्र भगवंताची भेट घडवून आणतात. भागवत कथा ही संसाराचा ताप घालवून मानवी जीवनाला शितलता प्रदान करणारी असून ती मोह, माया, मद, मत्सर आणि लोभ नष्ट करते. ज्या घरात भगवंताच्या कथेचे निरूपण आणि श्रवण होते, तिथे कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा बाहेरील बाधा टिकू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवनातील दुःखाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कुंतीचे उदाहरण दिले. जीवनात दुःख आले की माणसाला भगवंताची आठवण होते, म्हणूनच भगवंताचे निरंतर स्मरण राहावे यासाठी स्वतःसाठी दुःख मागणारी महाराणी कुंती होती, हे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या तरुण पिढीवर भाष्य करताना त्यांनी पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपण्याचे आवाहन केले. “धर्म आणि संस्कृतीतून येणारे नात्यांचे महत्त्व न समजल्यामुळे आजचे युवक-युवती एकमेकांना धोके देत आहेत. संसारिक नात्यात फसवणूक होऊ शकते, मात्र भगवान कधीही कुणाला धोका देत नाहीत. भागवत कथा माणसाला याच धोक्यांपासून सावधान राहण्याचा संदेश देते,” असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर