गोपालकाला हा समाजात असणारे भेदभाव नष्ट करतो:देशमुख महाराज, विठ्ठल मंदिर येथे भागवत सप्ताह‎

जुने शहरात श्री विठ्ठल मंदिर येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या भागवत सप्ताहामध्ये सहाव्या पुष्पात हभप सुजित महाराज देशमुख यांनी भागवत कथेमधील श्रीकृष्णाच्या बाललीला स्कंध उलगडून सांगितले. गोपालकाला हा समाजातील भेदभाव नष्ट करतो, असे ते म्हणाले. यावेळी गोपालकाला व गोवर्धन पूजा करण्यात आली. भगवान श्रीकृष्ण नंदराजा, यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसे त्यांच्या बाल लिलांचे सुंदर वर्णन आहे. गोप व गोपिकांसोबत जंगलात खेळणे, गाईंसोबत असलेले त्यांचे विशेष प्रेम, यशोदामैय्याला आपल्या लिलांनी त्रास देणे त्यांना मोहित करणे व आपल्या दिव्यत्वाचा आभास करून देणे अशा कथा सुजित महाराज यांनी सांगितल्या. त्यावेळी कालिया मर्दन, कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेली पुतना व तिचा केलेला वध या सर्व बाललीला भगवंताने आपल्या समर्थ्याने केल्या हे ही सांगितले.भगवान श्रीकृष्ण नंदराजा, यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसे त्यांच्या बाल लिलांचे सुंदर वर्णन आहे. गोप व गोपिकांसोबत जंगलात खेळणे, गाईंसोबत असलेले त्यांचे विशेष प्रेम होते. गोपालकाला करून आजच्या सत्राचे समापन करण्यात आले. त्यानंतर महाआरतीच्या वेळी सर्वसेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा तसेंच मंडळाकडून यजमान विकास, वैशाली वाणी, प्रवीण पुरवार सपत्नीक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी व्यवस्थापक रमेश अलकरी यांचे मार्गदर्शनाखाली नितीन खोत, अजय खोत, प्रमोद अलकरी, नितीन विसपुते, कैवल्य अलकरी, संजय कुलकर्णी, उमेश डहाके, गजानन ठोसर, यश ठाकूर, भगवान मेहर परिश्रम घेत आहेत. तसेच भागवत समाप्तीला म्हणजेच पौर्णिमा ३१ मे रोजी रुख्मिणी स्वयंवाराची कथा व श्रीकृष्ण रुख्मिणी विवाह देखावा करण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!