ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

इतिहासातील चुका टाळा:ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे आवाहन, ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे व्याखानाचे आयोजन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी भारतीय समाजाने इतिहासातून बोध घेऊन भूतकाळातील चुका टाळाव्यात, असे प्रतिपादन केले. ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. तत्कालीन समाज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूने ठामपणे उभा न राहणे ही एक मोठी चूक होती, असेही त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या उभारणीमध्ये शहीद झालेल्या कारसेवकांची नावे अयोध्येत आणि इतिहासात कोरली जावीत, यासाठी आपण मोहीम हाती घेऊ, असे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले. या मोहिमेची सुरुवात बाणेर येथील सभेमधून होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. बाणेर येथील माऊली गार्डनमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सावरकर विचार दर्शनचे संपादक सात्यकी सावरकर, ‘हर घर सावरकर’चे गिरीश देशपांडे, ब्राह्मण सांस्कृतिक संघाचे उमेश फडके, उमा गाडगीळ आणि अस्मिता करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कुलश्रेष्ठ यांनी आपल्या व्याख्यानात हिंदु-मुसलमान संबंध, संविधान, सेक्यूलर संकल्पना, बाबरी मशीद आणि राम मंदिर, तसेच वंदेमातरम् गीत यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर आपले विचार मांडले. समाजात तथाकथित ‘बडे आदमीं’चे वाढते अनुकरण धोकादायक असून, त्यामुळे खरे आदर्श मागे पडतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनाविषयी बोलताना ते म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असे म्हणणे योग्य नाही, तर त्या दिवशी फक्त सत्तेचे हस्तांतरण झाले, हे वास्तव आहे. अहिल्यादेवी होळकरांनी श्री काशी विश्वेश्वर मंदिरातील पूजा पुन्हा सुरू करून संस्कृतीचे प्रवाहीपण अबाधित राखले. सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांसारख्या कृतीशील व्यक्तींची उदाहरणे समाजाने नेहमी समोर ठेवली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. सावरकर त्यांच्या काळात शंभर वर्षे पुढचा विचार करत होते, मात्र त्यांना समजून न घेतल्याने आजही त्यांचे नाव घेताना लोक कचरतात, असे कुलश्रेष्ठ म्हणाले. मतदान करताना पक्ष, जात आणि फुकटेगिरी यापलीकडे जाऊन सूज्ञ विचार करणे आवश्यक आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी आणि त्यामागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुत्सद्देगिरी व धोरणीपणा समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आजही जग युद्धग्रस्त असताना मोदींनी कृतीशील मौनाचा आदर्श निर्माण केला आहे, असेही ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर