ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

राखेच्या धुळीने मासोद गावचा श्वास गुदमरला:आरोग्यासह पर्यावरण धोक्यात; ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनास दिले निवेदन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मासोद गावात गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरून आणून टाकण्यात येणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांचे जीवन अक्षरशः धुळीला मिळाले आहे. राखेच्या प्रचंड प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. या विरोधात आता मासोदकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास ६ जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येणारी राख वाऱ्यामुळे उडून संपूर्ण गावात पसरते. अनेकदा धुळीचे साम्राज्य इतके वाढते की समोरील रस्तेही दिसेनासे होतात. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे गावात अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. गावात बाहेरून राख आणणे व टाकणे तात्काळ बंद करावे. आधीच साठवून ठेवलेल्या राखेची योग्य विल्हेवाट लावावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच, ग्रामपंचायतीने ग्रामसभा व मासिक बैठकीत याबाबत कायदेशीर ठराव मंजूर करावा. संबंधितांना नोटीस बजावावी. अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. निवेदन सादर करताना गिरीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राहुल पुरी, सूरज गवळी, गौरव नंदनवार, अविनाश मसराम, अक्षय कुंभरे, अनिकेत सुनकर, अभिषेक उमक, अनिकेत वैद्य, महेश केवतकर यांच्यासह मासोद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य धोक्यात आले धोक्यात; कारवाई हवी मासोद गावातील राख प्रदूषणाचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गावात राख आणणे व टाकणे कायमस्वरूपी बंद करावे. अन्यथा ०६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनापासून गावकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. – गिरीश चौधरी, समाजसेवक.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर