ब्रेकिंग न्यूज
Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार
SP News Maregaon

Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: देशसेवेसाठी भारतीय सैन्यात जाण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. आता सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना हे स्वप्न साकार करण्याची संधी आहे. या जिल्ह्यातील युवकांसाठी कोल्हापुरात 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान अग्निवीर भरती होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून नियोजन असून जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी याबाबत आढावा घेतला.

नुकतेच अग्निवीर भरती प्रक्रियाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी संचालक कर्नल प्रशांतसिंग, कर्नल संबित पात्रा, सुभेदार मेजर जसविंदर सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भीमसेन चवदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नोकरी सोडून शेती करायचा घेतला धाडसी निर्णय, शेवगा शेतीतून नशीब पालटलं, वर्षाला 12 लाखांची बंपर कमाई

बस, भोजन अन् पिण्याचे पाणी

अग्निवीर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या बसेस, भोजन, पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच गर्दी होऊ नये, यासाठी चोख वाहतूक व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

आमिषाला बळी पडू नका

अग्निवीर भरती ही पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रता यांच्या आधारावरच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी आर्थिक आमिष आणि फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन कर्नल प्रशांतसिंग यांनी केले आहे. भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र पाठवण्यात येणार आहे. 16 सप्टेंबर रोजी रात्रीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, अग्निवीरसोबतच महाराष्ट्र राज्याच्या महिला सेना पोलीस पदासाठी देखील भरती होईल. ही भरती  29 सप्टेंबरला होणार आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर