लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष ,नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि आता 71 लाख बहीणींना त्यापासून वंचित केले जात आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो हे सरकार केवळ मतांसाठी राजकारण करते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यामध्ये बरेच काही माहिती समोर येत आहे. आपण पोलिस आणि एसआयटी चौकशीला वेळ दिला पाहिजे. खरातची पत्नी दोन दिवसांपासून फरार आहे त्या का भेटत नाही याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. ..अजितदादांच्या पक्षावर आम्ही बोलणार नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाने जर जय पवारांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी राजकारणात यायला काही अडचण नाही. जय पवारांनी त्यांचे कर्तृत्व दाखवावे. त्यांच्या पक्षाची अंतर्गत काही चर्चा झाली यावर आम्ही बोलणे योग्य नाही. पण सुनेत्रा पवारांनी घेतलेला निर्णयावर त्या सांगू शकतील. अजित पवार यांच्यापक्षाबद्दल बोलण्याचा माझा काहीही संबंध नाही. त्यावर मी बोलणार नाही. त्यांनी सत्य तरी मान्य केले शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत आमची विलनीकरणाबद्दल चर्चा झालीच होती हे आम्ही अधीच सांगितले होते. जे काही त्या चर्चेत ठरले होते ते ठरले होते. आता काही लोकांनी सत्य सांगितले आहे. आता त्यावर काही लोकांनी उशिरा का होईना सत्य मान्य केले.
हे वृत्तही वाचा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 71 लाख महिला अपात्र:ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी! 1 कोटी 75 लाख महिलांना मिळणार लाभ राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. वाचा सविस्तर
