ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

अहंकार त्याग केल्याशिवाय भगवंत कधी भेटणार नाही- रेवतीनंदन दास:इस्कॉनतर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्रीमद् भागवत कथेची सांगता होते, तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ आलेले असतात. आज घरात होम थिएटर, शाही सोफा सेट यांसारखी अत्याधुनिक सुखाची साधने उपलब्ध असूनही माणसाचे जीवन ‘अपसेट’ आहे. ताजमहालसारखा देखणा बंगला उभारला, तरीही मनात घमेंड आणि मीपणा असेल, तर तिथे श्रीकृष्ण कधीच येत नाहीत. आपण जेव्हा बासरीसारखे आतून पोकळ (अहंकाररहित) आणि खुले होऊ, तेव्हाच श्रीकृष्ण त्यात आपले सुमधुर सूर भरतील, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवन येथे इस्कॉनच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साहात झाली, याप्रसंगी आ. संग्राम जगताप, पार्वतीबाई अरुणकाका जगताप, इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, डॉ. सौ. अंजली फाटके, वंदना कानडे, मिना जग्गड, सोनाली चवंडके, मिलिंद चवंडके, अशोक कानडे आदी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, इस्कॉनच्या वतीने अधिक महिन्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ‘श्रीमद् भागवत कथा’ भाविकांची भक्ती भावना अधिक वृद्धिंगत करणारी ठरली आहे. संतांचे विचार आणि भगवंताचे नामस्मरण माणसाला जीवनाचा खरा मार्ग दाखवते. सोहळ्यादरम्यान यश गोडसे याने श्रीकृष्ण रूपात, तर गायत्री माणिक हिने रुक्मिणी रूपात कथास्थळी प्रवेश केला. या मनमोहक रूपांचे भाविकांनी पुष्पवृष्टी आणि जयजयकार करत उत्स्फूर्त स्वागत केले. या बालरूपांमुळे संपूर्ण मंडप भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. भक्तिमय वातावरणात झालेल्या महाआरतीनंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इस्कॉनच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शरणागती भगवंताचा मार्ग आपला श्वास सुरू आहे, आपण बोलू-ऐकू शकतो, ही केवळ श्रीकृष्णाचीच कृपा आहे. रावण आणि कंसासारख्या अहंकारी व्यक्तींना कधीच भगवंताचे दर्शन घडले नाही. आपण भगवंताकडे एक पाऊल टाकले, तर तो आपल्यासाठी शंभर पावले पुढे येतो. श्रीकृष्णाच्या गवळी सवंगड्यांनी स्वतःला भगवंताच्या स्वाधीन कसे करायचे, याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. भाविकांनी नामस्मरणाच्या बळावर या जन्माचे सार्थक करावे, असे आवाहन रेवतीनंदन दास यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर