मानवत तालुक्यातील यशवाडीत मंदिराच्या गाभाऱ्याचे छत कोसळून शनिवारी ५ भाविकांचा मृत्यू झाला होता. या मंदिराच्या बांधकामावेळी राजस्थानच्या कंत्राटदाराला दर्शन बंद करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने दर्शन बंदकरण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले होते. त्यामुळे या दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार आहे. प्रशासनाने चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशीमागणी यशवाडी मंदिर संस्थानचे अध्यक्षशिवेंद्र स्वामी यांनी केली. दरम्यान,प्रशासनाच्या वतीने ३ दिवस मंदिर बंदठेवण्यात आले आहे. यशवाडी येथे २० जून रोजी मंदिराच्या गाभाऱ्याचे छत कोसळून ५ भाविक दगावले. यात १८ जण जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने नांदेड येथे हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.मंदिर परिसरात १० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५ वर्षांपूर्वी कंत्राटदाराला दिले काम : मंदिराच्याबांधकामासाठी ५ वर्षांपूर्वी भाविकांकडून वर्गणी गोळा करूनराजस्थानच्या कंत्राटदाराला काम देण्यात आले होते. कोरोनाच्याकालावधीत हे काम थांबले होते. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्याकामासाठी मोठ्या प्रमाणात दगडी शिळा लागणार, या मंदिराला शिळांचीकमतरता भासत होती. त्यामुळे मंदिराच्या कामाची गती मंदावली होती.मात्र गेल्या दीड वर्षांपासून मंदिराचे काम सुरू करण्यात आले होते. चौकशीनंतर गुन्हे दाखल होणार
रविवारी परभणीतील पुरातत्व विभाग व बांधकामविभागातील अभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊनपाहणी केली. तसेच मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिटकरण्यासाठी पुणे व छत्रपती संभाजीनगर येथीलपथकांना बोलावले आहे. २२ जून रोजी ही पथकेयशवाडी येथील मंदिरात येणार आहेत.प्रशासनाच्या वतीने या दुर्घटनेची सखोल चौकशीकरण्यात येणार आहे. त्यानंतर दुर्घटनेसाठीजबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल होईल. यशवाडी येथील मंदिराभोवती तारेचे कुंपण करण्यात आले आहे. इनसाइड स्टोरी: मंदिरासाठी १.७ कोटींचे कंत्राट
१ कोटी ७ लाख ६ हजार रुपयांना मंदिराच्या कामाचेकंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी २१ लाखरुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. तरउर्वरीत रक्कम टप्प्याटप्प्याने दिले जाणार होते.राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणीदर्शनासाठी येतात. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यानेमंदिराच्या कामाला भरीव मदत मिळत आहे.
