यशवाडीची आपत्ती:दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार, त्याने‎ दर्शन सुरू ठेवले : संस्थानचे अध्यक्ष, 3 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद

मानवत तालुक्यातील यशवाडीत मंदिराच्या‎ गाभाऱ्याचे छत कोसळून शनिवारी ५‎ भाविकांचा मृत्यू झाला होता. या मंदिराच्या‎ बांधकामावेळी राजस्थानच्या कंत्राटदाराला ‎दर्शन बंद करण्याबाबत विचारणा करण्यात‎ आली होती. मात्र कंत्राटदाराने दर्शन बंद‎करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले ‎होते. त्यामुळे या दुर्घटनेस कंत्राटदार‎ जबाबदार आहे. प्रशासनाने चौकशी करून‎ दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी‎मागणी यशवाडी मंदिर संस्थानचे अध्यक्ष‎शिवेंद्र स्वामी यांनी केली. दरम्यान,‎प्रशासनाच्या वतीने ३ दिवस मंदिर बंद‎ठेवण्यात आले आहे.‎ यशवाडी येथे २० जून रोजी मंदिराच्या‎ गाभाऱ्याचे छत कोसळून ५ भाविक दगावले. ‎‎यात १८ जण जखमी आहेत. जखमींपैकी ‎‎एकाची प्रकृती गंभीर असल्याने नांदेड येथे ‎‎हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृतीही स्थिर ‎‎असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.‎मंदिर परिसरात १० पोलिसांचा बंदोबस्त ‎‎लावण्यात आला आहे.‎ ५ वर्षांपूर्वी कंत्राटदाराला दिले काम : मंदिराच्या‎बांधकामासाठी ५ वर्षांपूर्वी भाविकांकडून वर्गणी गोळा करून‎राजस्थानच्या कंत्राटदाराला काम देण्यात आले होते. कोरोनाच्या‎कालावधीत हे काम थांबले होते. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या‎कामासाठी मोठ्या प्रमाणात दगडी शिळा लागणार, या मंदिराला शिळांची‎कमतरता भासत होती. त्यामुळे मंदिराच्या कामाची गती मंदावली होती.‎मात्र गेल्या दीड वर्षांपासून मंदिराचे काम सुरू करण्यात आले होते.‎ चौकशीनंतर गुन्हे दाखल होणार‎
रविवारी परभणीतील पुरातत्व विभाग व बांधकाम‎विभागातील अभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊन‎पाहणी केली. तसेच मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट‎करण्यासाठी पुणे व छत्रपती संभाजीनगर येथील‎पथकांना बोलावले आहे. २२ जून रोजी ही पथके‎यशवाडी येथील मंदिरात येणार आहेत.‎प्रशासनाच्या वतीने या दुर्घटनेची सखोल चौकशी‎करण्यात येणार आहे. त्यानंतर दुर्घटनेसाठी‎जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल होईल.‎ यशवाडी येथील मंदिराभोवती तारेचे कुंपण करण्यात आले आहे. इनसाइड स्टोरी: मंदिरासाठी १.७ कोटींचे कंत्राट‎
१ कोटी ७ लाख ६ हजार रुपयांना मंदिराच्या कामाचे‎कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी २१ लाख‎रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. तर‎उर्वरीत रक्कम टप्प्याटप्प्याने दिले जाणार होते.‎राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी‎दर्शनासाठी येतात. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने‎मंदिराच्या कामाला भरीव मदत मिळत आहे.‎
‎‎

Leave a Comment

error: Content is protected !!