अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीचा लाभ मिळेल, असा महायुतीचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला असून, या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 55 उमेदवारांनी उडी घेतल्याने लढतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हान वाढले असून, ही लढाई आता अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाही. या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना शब्दही दिला असल्याचे समजते. भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील- मुख्यमंत्री राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना सोबत घेऊन सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा महत्त्वाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करेल, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी या भेटीदरम्यान दिली. 23 एप्रिल रोजी मतदान दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि आता त्यांनी या रिक्त जागेवरून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 55 उमेदवार उतरल्याने लढत अत्यंत रंगतदार होणार आहे. पार्थ पवारांची कॉंग्रेसवर टीका दुसरीकडे, काँग्रेसने या मतदारसंघात आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ही काँग्रेसच्या डाऊनफॉल सुरुवात आहे, असे आक्रमक वक्तव्य केले आहे. पार्थ पवार यांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या टीका-प्रतिटीकांमुळे बारामतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात तब्बल 55 उमेदवार!:भाजप मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभा, CM देवेंद्र फडणवीसांचा पवारांना शब्द
-
By सुरेश पाचभाई
- April 8, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
फडणवीसांकडून नितेश-नीलेशचं जोरदार कौतुक:नारायण राणेंच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांच्या...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव:महात्मा फुलेंनी त्या काळी...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
‘ऑपरेशन टायगर’च्या बातमीने ठाकरे गटात अस्वस्थता:बातमी देणाऱ्या...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला:पायलटने हेलिकॉप्टर...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
