ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र होणार:अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी, मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवण्यासाठी येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ येथील श्री रामदेवजी बाबा मंदिर सभागृहात ही परिषद पार पडली. या परिषदेला विदर्भातील १५० हून अधिक प्रमुख मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, देवस्थान सेवा समितीचे राज्य पदाधिकारी अनूप जयस्वाल, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते. परिषदेत बोलताना सुनील घनवट म्हणाले की, सरकारने ३ मे रोजी आणलेले जाचक इनाम निर्मूलन प्रारूप अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच १३ जून रोजी, स्थगित करणे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय आहे. मंदिर महासंघामुळे मंदिर विश्वस्तांमध्ये मोठी संघटन शक्ती निर्माण झाली आहे. आता कोणत्याही एका मंदिराची समस्या ही संपूर्ण हिंदू समाजाची समस्या मानून लढले पाहिजे. जर हीच वज्रमूठ पुढे कायम राहिली, तर देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे बळकावलेल्या मंदिरांच्या जमिनी मुक्त करणे हा महासंघाचा पुढचा मोठा लढा असेल, असेही त्यांनी जाहीर केले. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मंदिर सुरक्षेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला. केवळ पूजा-अर्चा न करता, काळानुसार मंदिरांच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, व्यायामशाळा, गोशाळा यांसारखे समाजोपयोगी उपक्रम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मानसिकतेमुळे अशा जाचक कायद्यांची निर्मिती होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून या मागण्या शासनाकडे पोहोचवून योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परिषदेची प्रास्ताविक भूमिका मांडताना श्रीकांत पिसोळकर यांनी मंदिरे ही केवळ धार्मिक विधींची जागा नसून ती ‘सनातन धर्म प्रचाराची’ आणि संस्कृती रक्षणाची मुख्य केंद्रे बनली पाहिजेत, असे सांगितले. या परिषदेला अंबादेवी संस्थानचे ॲड. राजेंद्र पांडे, पिंगळादेवी संस्थानचे विनीत पाकोडे यांसह अनेक मान्यवर विश्वस्त उपस्थित होते. ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायद्याची आता असणार खरी गरज अनूप जयस्वाल यांनी ‘महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम’ हा हिंदू मंदिरांसाठी कसा जाचक होता, यावर प्रकाश टाकला. मंदिरांच्या जमिनी हडप करणाऱ्या भूमाफियांविरोधात शासनाने कडक ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायदा आणण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर