ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

अकोल्यात गुरुवारपर्यंत मान्सूनचे आगमन शक्य:अर्धा मान्सून केरळमध्ये दाखल; उर्वरित वळला अंदमान निकोबारच्या दिशेने‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मान्सून गोव्यापर्यंत पोहोचला असला तरी तो अद्याप फारसा सक्रिय झालेला नाही. सध्या राज्यात पूर्व-मोसमी पाऊस सुरू असून, महाराष्ट्रासह विदर्भातील अकोल्यात १० तारखेपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांची गती व दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित असलेली पावसाची जोरदार झड अद्याप आलेली नाही. सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मान्सून कर्नाटकापर्यंत पोहोचला असून, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी (कोकण), पुणे, सातारा आणि सोलापूर या भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, अरबी समुद्राचे काही वारे राजस्थान आणि दिल्लीपर्यंत पोहोचले असून तेथून ‘यू-टर्न”” घेत जळगाव, इंदूर मार्गे अकोला आणि नागपूरसह विदर्भाकडे वळत आहेत. यामुळे विदर्भातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोकण, पुणे, सातारा येथपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता असून तेथून तो विदर्भाकडे येईल. महाराष्ट्रात मान्सूनचा मुख्य पाऊस १० तारखेच्या आसपास सुरू होईल. विदर्भातही या काळात मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही मान्सूनचे जोरदार वारे पोहोचलेले नाहीत. जर वाऱ्यांची दिशा सरळ असती, तर आतापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश होऊन पावसाची चांगली झड पाहायला मिळाली असती, असे हवाानतज्ञांनी सांगितले. प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. ७५ मिमी पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला सध्याच्या पूर्व-मोसमी किंवा तुरळक पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी सलग दोन-तीन चांगल्या पावसाची गरज असते. घाईघाईत पेरणी केली आणि त्यानंतर पावसात आठवड्याभराचा खंड पडला, तरी कोरड्या जमिनीत बियाणे खराब होण्याची शक्यता असते. अल निनोमुळे विलंब वाऱ्यांची दिशा बदलल्याने मान्सूनला विलंब झाला आहे. ‘अल निनोमुळे मान्सूनच्या वाऱ्यांवर परिणाम झाला. कन्याकुमारी, श्रीलंका, अंदमान निकोबारमध्ये समुद्राचे तापमान अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने मान्सूनचे वारे थेट महाराष्ट्राकडे (केरळ-गोवा-मुंबई मार्गे) न येता दुसरीकडे वळले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर