Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

ग्राउंड रिपोर्ट‎:संभाजीनगरात महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून विशिष्ट रस्त्यावरूनच उचलल्या जातात दुचाकी-चारचाकी

शहरामध्ये मनपाकडून पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली नसताना रस्त्यावर लावलेली वाहने उचलण्याचा सपाटा मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीने लावला आहे. दुचाकी उचलताना अप्रशिक्षित कामगार असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होते. मनपाचे जवानांकडूनदेखील विशिष्ट्य रस्त्यावरच उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर कारवाई केली जात आहे. यामुळे जुने शहर, टीव्ही सेंटर, रोशन गेट, क्रांती चौक, निराला बाजार, चंपा चौक ते मनपा मुख्यालय, शिवाजीनगर, जालना रोड, महावीर चौक या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होत असतानादेखील याकडे मनपा डोळेझाक करत आहे. मॉल आणि धर्मादाय रुग्णालयांडून पार्किंग वसूल न करता मोफत पार्किंग द्यावी. मनपाने त्यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्याअगोदर मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. 2025 मध्ये मनपाने ठराव घेऊन 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये चारचाकी वाहनासाठी दंड आकारण्याबाबत ठराव घेण्यात आला आहे. नो पार्किंगमधील वाहने गरवारे स्टेडियमवर उचलून नेली जातात. या परिसराच्या जवळपास असलेल्या परिसरातीलच वाहनावर आम्ही कारवाई करत असल्याचे एका नागरी मित्र पथकाच्या जवानाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दिव्य मराठीच्या पाहणीत काय आढळले? हॉस्पिटल, मॉलच्या पत्रावर कारवाई शहरातील प्रोझोन मॉल, एमजीएम हॉस्पिटल, मेडिकव्हर हॉस्पिटल आदी ठिकाणांहून सर्वाधिक वाहने उचलली जातात. दवाखान्यात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. पार्किंगला 10 ते 20 रुपये वाचवण्यासाठी बाहेर वाहने लावणाऱ्या नागरिकांना मनपा 500 ते 2000 हजारांचा भुर्दंड देत आहे. दरम्यान, याविषयी मनपाला विचारणा केली असता या आस्थापनांनी आम्हाला पत्र दिले असल्याने आम्ही उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च 2025 मध्ये ॲक्टिव्ह मोटर्सला काम शहरातील पार्किंगला शिस्त लागावी यासाठी मार्च 2025 मध्ये ॲक्टिव्ह मोटर्सला काम देण्यात आले आहे. दुचाकी उचलण्यासाठी तीन वाहने लावली असून प्रत्येक गाडीसोबत महापालिकेचे जवान आहेत. दुचाकी उचलल्यानंतर 500 रुपये शुल्क असून त्यातील 200 रुपये मनपाला, तर 300 रुपये एजन्सीला मिळतात. शहरात जेथे वाहतूक कोंडी तेथे कारवाई विशिष्ट्य भागातून वाहने उचलली जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत. असे असेल तर नागरी मित्र पथकाला सांगून शहरात सर्व ठिकाणी कारवाई करण्यात येईल. वाहतुकीला शिस्त लागणे अत्यंत आवश्यक आहे. -संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!