ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

अमरावती विभागाला सर्वाधिक 8, तर संभाजीनगरला 5.92 कोटींचा निधी:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाराज्य सरकारकडून 25 कोटींची मदत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा सततचा तगादा या दुष्टचक्रामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या राज्यातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील शेतकरी कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी आत्महत्याप्रकरणी त्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने २५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मंगळवार, ९ जून २०२६ रोजी जारी केला आहे. या निधी वाटपात शेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या अमरावती विभागाला सर्वाधिक ८ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी आपापल्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांच्या मागणीनुसार हा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात देशातील शेतकरी आत्महत्येपैकी ४० टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. राज्यात दररोज सरासरी १७ आत्महत्या हेात आहेत. गेल्या सात दिवसांत ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामागे शेतीतील वाढता खर्च, पिकाचा अनिश्चित व कमी भाव, कर्ज व लहरी हवामान ही कारणे आहेत. कोणाला किती निधी? अमरावती ८.७६ कोटी
संभाजीनगर५.९२ कोटी
नागपूर५. ७५ कोटी
नाशिक३.३९ कोटी
पुणे१.०६ कोटी
कोकण१२.०० लाख

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर