ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

पुरवठा न सुधारल्यास महावितरणला टाळे:सांगोल्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर झाला असून भारनियमन वाढले आहे. तालुक्यात भारनियमन वाढल्याने शेतातील पिके, फळबागा जळून जात आहेत. तसेच जनावरांचे दूध काढण्याच्या वेळी वीज नसल्याने जनावरांच्या धारा हाताने काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालक चिंतेत आहेत. आठ दिवसात तालुक्यातील भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून महावितरणच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात जाणवणाऱ्या दैनंदिन समस्या याबाबत माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड, सभापती पूनम इंगवले यांच्यासह तानाजी पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे, नगरसेवक गणेश बनकर यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मिळाले मात्र, कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने टेंभूचे पाणी सोडण्यात अडचणी निर्माण झाल्या. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासू लागली आहे. कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कामाला लागावे. भविष्यकाळाच्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीवर आपली सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सोयीस्कर भूमिका घ्यावी. राजकारणाच्या पुढील काळात कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तोच निर्णय घेतला जाईल,” असा विश्वास त्यांनी दिला. येणाऱ्या सोमवारी सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला सोमवारी लेखी निवेदन देऊन भारनियमन कमी करण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात येईल. तरीही, भारनियमन कमी न झाल्यास मात्र कार्यकर्त्यांना घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येतील असे या आढावा बैठकीत सर्वानुमते ठरले. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड म्हणाल्या की, तालुक्यात विजेचा, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे. कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. जनतेच्या अडचणी सोडवा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर