लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण त्यांचा पक्ष लोकशाहीवर नाही तर घराणेशाहीवर चालतो, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांना कुठेच मान्यता नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने काम करत आहे, त्यासाठी ते रोज राहुल गांधींना सल्ले देतात. उबाठा खड्ड्यात घातल्यानंतर आता काँग्रेस खड्ड्यात घालण्याचे काम राऊतांकडून करण्यात येणार आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुम्ही लुटारू सैनिक आहात हे जनतेने पाहिले आहे. तुम्ही महाराष्ट्र, मुंबई, पत्राचाळीची लुट केली. तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करू नका. तुम्ही लुटारू सैनिक आहात. राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांना विनंती केली आणि ती मान्य केली. तर लक्ष्णण हाके यांनी विनंती दत्ता भरणे यांची विनंती मान्य केली. ही काय धमकी नाही. आम्ही लोकांना साथ देतो म्हणून लोकं आमची विनंती मानतात. राहुरीच्या विकासासाठी साथ नवनाथ बन म्हणाले की, राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला साथ देण्याचे काम केले आहे.त्यांचे मी आभार व्यक्त करतो. काल रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली, यावेळी राहुरीच्या विकासासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनी लोकशाही कुठे आहे, आणि ट्रम्प शाही कुठे आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तुमच्या कार्यकाळात राज्याची वाट लावली तेव्हा तुम्हाला लोकशाहीची आठवण झाली नाही का? असा सवाल बन यांनी केला आहे. उमेदवार नेमका कुणाचा? नवनाथ बन म्हणाले की, बारामतीमध्ये जो उमेदवार काँग्रेसने दिला आहे, तो काँग्रेसचा आहे की मविआचा हे संजय राऊत यांना समजत नाहीये, ते संभ्रमात आहेत. उद्धव ठाकरेंना वाटते की सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा. पण दुसरीकडे संजय राऊत यांना वाटते की काँग्रेस उमेदवाराला उबाठाने पाठिंबा दिला पाहिजे. हाच संजय राऊतांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला बारामतीमध्ये पाठिंबा दिला तर ते आपल्याला राज्यसभेची खासदारकी देतील हे लक्षात घेऊन ते काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मविआत त्यांना राहुरी, बारामतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे ठरतच नाही. उबाठामध्ये दोन गट नवनाथ बन म्हणाले की, उबाठामध्ये दोन गट पडले आहेत, त्यामुळे त्यांना बारामतीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा हे समजत नाही. राऊतांचा गट काँग्रेस तर उद्धव ठाकरेंचा गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावे म्हणतोय. त्यांच्यातील हा वाद आता समोर आला आहे. उबाठामध्ये बारामती पोटनिवडणुकीवरून प्रचंड गोंधळ आहे. देवाभाऊंच्या कार्यकाळात अनेक कामे सुरू नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसच्या काळात मुंबईमध्ये केवळ एक मेट्रो होती. तर देवाभाऊंच्या कार्यकाळात 11 मेट्रोची कामे सुरू आहेत. यातील दोन मेट्रोचे आज उद्घाटन झाले. नागरिकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम देवाभाऊंच्या माध्यमातून सुरू आहे.
ज्यांचा पक्ष घराणेशाहीवर चालतो, त्यांनी लोकशाहीवर बोलू नये:संजय राऊत हे तर ‘लुटारू सैनिक’, त्यांनी आधी उबाठा संपवली, आता काँग्रेसची बारी- नवनाथ बन
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
मार्डी–बामर्डा जंगलात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न फसला;...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
पार्थ काँग्रेसच्या बाबतीत चुकला:रोहित पवारांनीही टोचले पार्थ...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
राज्य मंत्रिमंडळाचे 5 धडाकेबाज निर्णय:महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
साधुग्रामसाठी झाडे तोडणे कोणत्या संस्कृती बसते?:वकील असीम...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले:विलास लाडच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 7, 2026
