Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
19 दिवस सरकारची अग्निपरीक्षा:पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? जाणून घ्या, राजकीय रणांगणात कोणती शस्त्रे विरोधकांच्या हाती | ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल | रोहिणी खडसेंचा राम शिंदेंवर पलटवार:अहिल्यानगरच्या एका धोंड्याला फार मिरची लागली, कुंडली काढली तर राजकारणाला रामराम करावा लागेल! | राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब | संजय राऊतांना ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाडच शोभते!:भाजपचा जोरदार पलटवार, म्हटले- संकटांवर राजकारण करण्याची त्यांची सवय!
SP News Maregaon
ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल

ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल

3 hours पूर्वी · 1 min read

auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे

छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर...

छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर तीव्र वाद झाल्याचे या कथित ऑडिओत ऐकायला मिळत आहे. हद्दीच्या नावाखाली सुरू असलेल्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत एका अधिकाऱ्याने, “ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही,” असे म्हणत नाराजी केली. या संभाषणात एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून बाहेरील भरारी पथक वैजापूर हद्दीत जाऊन कथित वसुली करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे आरटीओ विभागातील अंतर्गत संघर्ष, अधिकारक्षेत्राचा वाद आणि कथित वसुलीचे आरोप चर्चेत आले आहेत. दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.. राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. सविस्तर वाचा

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!