ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर तीव्र वाद झाल्याचे या कथित ऑडिओत ऐकायला मिळत आहे. हद्दीच्या नावाखाली सुरू असलेल्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत एका अधिकाऱ्याने, “ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही,” असे म्हणत नाराजी केली. या संभाषणात एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून बाहेरील भरारी पथक वैजापूर हद्दीत जाऊन कथित वसुली करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे आरटीओ विभागातील अंतर्गत संघर्ष, अधिकारक्षेत्राचा वाद आणि कथित वसुलीचे आरोप चर्चेत आले आहेत. दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.. राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर