ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:”जेथे उत्पन्न, तेथेच बस” धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने विरजण पाडले आहे. “जेथे उत्पन्न, तेथेच बससेवा’ हे ब्रीद घेऊन अकोले आगाराचा कारभार सुरू असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हाल गेल्या अनेक महिन्यांपासून सुरूच आहेत. तालुक्यातील अनेक आदिवासी गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज ४ ते ६ किलोमीटर पायी जंगलवाट तुडवत शाळा गाठावी लागते. सध्या तालुक्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, हिंस्र श्वापदे आणि विषारी सापांच्या वावरामुळे लहान मुले जीव धोक्यात घालून शिक्षणाची पायपीट करत आहेत. वाहतुकीची सोय नसल्याने काही पालकांनी तर मुलांची शाळा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. जर असे घडले, तर अकोले आगाराचा हा प्रथम पुरस्कार केवळ कागदावरच राहील आणि दुर्गम भागातील शिक्षणाची ज्योत विझेल, अशी भीती व्यक्त होत आहे. खासगी जीपचे भाडे परवडत नसल्याने आदिवासी बांधवांना पायी चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ‘शेवटच्या माणसापर्यंत एसटी पोहोचली का? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांतून बसफेऱ्या बंद असल्याने हा प्रथम पुरस्कार कशासाठी? असा सवाल आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, सयाजी अस्वले व गंगाराम धिंदळे यांनी उपस्थित केला आहे. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी बस स्वप्नच ग्रामीण भागांतील बससेवेअभावी आदिवासी विद्यार्थ्यांची ५ किमीची जीवघेणी पायपीट होतेय. पुरुषवाडी, बलठण, वांजुळशेत, माणिक ओझर, गोंदुशी, खडकी या डोंगराळ व जंगलव्याप्त भागांतील विद्यार्थी मवेशी येथील विद्यालयात येतात. अकोले आगाराने राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असले तरीदेखील अतिदुर्गम आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक बससेवा केवळ एक स्वप्नच ठरली आहे. – शांताराम काळे, सचिव, श्री स्वामी समर्थ विद्यालय, राजूर.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर