ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

नीट परीक्षेसाठी वायू दलाचा वापर हा मूर्खपणा:हवाई दल राष्ट्रीय सुरक्षेसाठी, भाजपच्या नाकर्तेपणाची भरपाई करण्यासाठी नव्हे – आंबेडकर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी हवाई दलाचा वापर करण्यास कडाडून विरोध केला आहे. भारतीय हवाई दल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अस्तित्वात आहे, ते भाजपचा नाकर्तेपणा व शिक्षण मंत्रालयातील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची भरपाई करण्यासाठी नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने नीट पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट हवाई दलाची मदत घेण्याच्या मुद्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावानुसार, हवाई दलाच्या विमनाांचा व त्यांच्या कडक सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर करून नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका थेट व सुरक्षितपणे वितरित केल्या जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला जागा उरणार नाही. या प्रस्तावावर अंतिम निर्णय पीएमओच्या मंजुरीनंतर घेतला जाईल. या सर्व प्रक्रियेवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नजर आहे. या पार्श्वभूमीवर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? प्रकाश आंबेडकर या प्रकरणीची एक बातमी पोस्ट करताना म्हणाले की, हा कसला मूर्खपणा आहे? खरोखरच, हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे. ‘NEET’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करण्यासाठी हवाई दलाची मदत घ्यावी लागत असेल, तर हे काही भक्कम सुरक्षेचे लक्षण नव्हे; उलट, ही पूर्णपणे कोलमडलेल्या परीक्षा पद्धतीचा जिवंत पुरावा आहे. ‘NEET’ पेपरफुटी केवळ प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणारे ट्रक असुरक्षित आहेत म्हणून होत नाही. तर, या गळतीचे मूळ व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचारात आहे. यात व्यवस्थेतीलच काही लोक सामील आहेत. प्रशासन व संपूर्ण व्यवस्थेमध्येच उत्तरदायित्वाचा (accountability) पूर्ण अभाव आहे, म्हणूनच ही पेपरफुटी होत आहे. ‘NEET’ परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी हवाई दलाचा वापर करणे हा केवळ मूळ समस्येवरून लक्ष विचलित करण्यासाठी रचलेला एक देखावा आहे. भाजपचे निष्ठावान समर्थक आणि काही विशिष्ट पत्रकार या मूर्खपणाचे किती उत्साहाने समर्थन करतील, याची मी सहज कल्पना करू शकतो. भारतीय हवाई दलाचे अस्तित्व हे देशाच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आहे. भाजपचा नाकर्तेपणा आणि शिक्षण मंत्रालयाला ग्रासून टाकणाऱ्या खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची उणीव भरून काढण्यासाठी नव्हे. धर्मेंद्र प्रधान यांना याची लाज वाटली पाहिजे. 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर धोक्यात घातल्यानंतर राजीनामा देण्याऐवजी, ते जनतेचे लक्ष मूळ समस्येवरून हटवण्यासाठी केवळ अशा मूर्खपणाच्या कृत्यांमध्ये मग्न आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारचे कान टोचताना म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर