ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?:काही जण उघड उघड बोलतायत…, आता हे अधिकृतपणे मान्य करायलाच हवं- अंबादास दानवे

उबाठा गटाचे 7 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू आहेत. या बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’बाबत आता उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले असून, त्यांच्या या विधानामुळे या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. अंबादास दानवे म्हणाले की, काही लोक संपर्कात आहेत तर काही जण आता उघड उघड बोलू लागले आहेत, त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. लोकसभा निवडणुकीपासून दर महिना-दोन महिन्यांनी अशा प्रकारच्या अंतर्गत चर्चा समोर येत आहेत, त्यामुळे आता हे अधिकृतपणे मान्य करायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दानवे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाचे खासदार खरोखरच शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का, यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून जनतेचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ते लोकांचे सोशल मिडीयावरील खाते बंद करतात. गेल्या 12 वर्षांमध्ये भाजपने लोकशाही संपवण्याचे काम केले आहे, असे उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर सरकार विरोधात आम्ही रस्त्यावर उतरत अहोत. पण कार्यकर्ते आज एका पक्षात असतात तर उद्या दुसऱ्या पक्षात जातात म्हणून जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असेही दानवेंनी म्हटले आहे.

हा कोणता न्याय? अंबादास दानवे म्हणाले की, मविआ म्हणून विधान परिषद निवडणूक आम्ही लढवत आहोत. बीड-धाराशिव-लातूरची जागा आम्ही ताकदीने लढत आहोत. सत्ताधारी पक्षाने निवडणूक लढण्याचे नवे तंत्र आणले आहे. इलेक्शन नव्हे,सिलेक्शन करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. कोणी निवडणुकीत उभेच राहू नये, जे उभे राहिले त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. तरीही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी मविआम्हणून ताकदीने निवडणूक लढवत आहोत. विधान परिषद निवडणुकीत उमेदवार उभाच राहू नये यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्ये उभ्या असलेल्या उमेदवाराला नोटीस पाठवण्यात आली, त्याचा जामीन रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यत जाण्याची तयारी होती असे दानवेंनी म्हटले आहे. राजकीय नेतृत्वांबद्दल जनतेमध्ये प्रचंड असंतोष अंबादास दानवे म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेचा आक्रोश समोर येत आहे. सर्वच राजकीय पक्ष, नेतृत्व ज्या पद्धतीने काम करतात त्यामध्ये विरोधी पक्ष असो की सत्ताधारी असो सर्वांबद्दल जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. म्हणून जनता अशा पद्धतीने जनता पर्याय शोधते आणि त्यातूनच कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून लोकं असंतोष व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!