ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:देशात मुलींचे प्रमाण हजारामागे 918, तर राज्यातील शहरांमध्ये फक्त 885, गर्भलिंग चाचणीचा परिणाम; बिहार व हरियाणाच्या रांगेत बसला महाराष्ट्र

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशपातळीवर मुलींचा जन्मदर सुधारत असताना पुरोगामी महाराष्ट्राच्या शहरी भागात मात्र मुलींचा जन्मदर प्रचंड वेगाने घटतो आहे. देशात १००० मुलांमागे ९१८ मुली, तर महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात ८९९ मुलींचा जन्म झाला आहे. केंद्र सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम अर्थात एसआरएस-२०२४ च्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील शहरी भागात १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर आधी ९०८ होता. आता तो घसरून ८८५ वर येऊन ठेपला आहे. यामुळे बिहार आणि हरियाणाच्या रांगेत महाराष्ट्र जाऊन बसला आहे. विशेष म्हणजे देशातील २२ मोठ्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राची कामगिरी सर्वात खराब आहे. महाराष्ट्र १८ व्या स्थानावर फेकला गेला आहे. देशातील ८९ लाख नागरिकांच्या सर्वेक्षणातून एसआरएसचा अहवाल तयार झाला आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या या अहवालाचे ‘दिव्य मराठी’ने विश्लेषण केले तर हे धक्कादायक वास्तव समोर आले. शहरात मुली घटल्या देशात ग्रामीण भागात १००० मुलांमागे ९१४ तर शहरात ९२८ मुली जन्मतात. राज्यात २०१२-१४ मध्ये १००० मुलांमागे ८९६ मुली होत्या. २०२२-२४ मध्ये ही संख्या ८९९ झाली. ग्रामीण महाराष्ट्रात मुलींचा जन्मदार ८८८ वरून ९१० वाढला. शहरात मुलींचा जन्मदर ९०८ वरून ८८५ वर घसरला. स्त्री शिक्षणाचा परिणाम देशात अशिक्षित महिलांचा एकूण प्रजनन दर ३.२ आहे. म्हणजेच या महिला सरासरी ३ पेक्षा जास्त मुलांना जन्म देतात. पदवीधर महिलांचा प्रजनन दर १.६ असून त्या १ ते २ अपत्यांनाच जन्म देतात. महाराष्ट्र आता वृद्धत्वाकडे वळतोय देशात ६० पेक्षा अधिक वयाचे ९.७% तर राज्यात १०.४% लोकं आहेत. राज्यात एकूण मृत्यूंपैकी ६७.२% तर देशात ६०.८% मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे. प्रजननदरही कमीच देशात प्रति महिला प्रजनन दर १.९ तर महाराष्ट्राचा १.४ आहे. म्हणजेच राज्याचा जन्मदर ०.०५ ने कमी आहे. आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाबचा प्रजनन दर महाराष्ट्रा ऐवढा आहे. तर दिल्ली (१.२), केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल प्रत्येकी १.३ आहे. बिहार (२.९) तर युपी २.६ आहे. मुलींचे विवाह उशिरा देशात महिला विवाहाचे सरासरी वय २३.१ तर राज्यात २३.४ आहे. देशात ग्रामीण भागात मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २२.६ तर शहरी भागात २४.४ आहे. महाराष्ट्रात हे वय अनुक्रमे २२.८ व २४.३ आहे. एक्स्पर्ट व्ह्यू ॲड. वर्षा देशपांडे सामाजिक कार्यकर्त्या प्रश्न : शहरात मुलींचा जन्मदर घटला?
उच्च जातीतील, श्रीमंतच गर्भलिंग चाचणी करू शकतात. ग्रामीणमधील शेतकरी पैसा कुठून आणेल. प्रश्न : मग यावर उपाय काय?
कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. कमिट्यांवर राजकीय नव्हे तर तज्ञ लोकांची नेमणूक झाली पाहिजे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर