देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक केवळ धर्माला पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच प्रश्न आहे की, तुम्ही किंवा तुमचे कुटुंब भविष्यात धर्मांतर करणार आहात का? जर तुम्ही धर्मांतर करणार नसाल, तर मग आरएसएस आणि भाजप जो ‘धर्माचा’ मुद्दा मांडत आहेत, तो तुम्हाला खरा का वाटतो?” अशा अत्यंत बोचऱ्या आणि थेट प्रश्नाने आंबेडकरांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या ध्रुवीकरणावर प्रहार करताना सांगितले की, भाजप आणि आरएसएसने जाणीवपूर्वक लोकशाहीला हुकूमशाहीत परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. “तुम्ही धर्मांतर करणार नसाल तर मग धर्माला धोका आहे, हा त्यांचा मुद्दा तुम्हाला पटतोच कसा? हा केवळ जनतेला गुमराह करण्याचा प्रकार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही आणीबाणी भोगली आहे, पण सध्याची पिढी एका वेगळ्याच छुप्या हुकूमशाहीकडे ढकलली जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. विरोधी पक्ष प्रश्न विचारायला घाबरतात केवळ भाजपवरच नव्हे, तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवरही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. राहुल गांधींचा उल्लेख करत ते म्हणाले, ” राहुल गांधी हे एपस्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानांचे फोटो आहेत का? याबाबत प्रश्न विचारत नाहीत. पेगेसीस किंवा इतर विषयात कोणताही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही. ईडी, सीबीआयचा सेसेमीरा विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे कोणताही विरोधी पक्षनेता बोलायला तयार नाही.” काँग्रेससोबतच्या युतीवर ‘सन्माना’ची अट मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससोबत जाणार का? या प्रश्नावर आंबेडकरांनी अत्यंत सावध आणि स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, “मी जर तोंड उघडले तर काँग्रेसला देशात फटका बसेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, म्हणून मी सध्या काही गोष्टी बोलत नाही. त्यामुळे मी काँग्रेसच्या गोष्टी आम्ही गुलदस्त्यात ठेवतो. मुंबईत काँग्रेस सोबत जायचे की नाही याबाबत आम्ही अजून भूमिका घेतलेली नाही. मात्र, जोपर्यंत सहयोगी पक्षाला सन्मान दिला जात नाही, तोपर्यंत आम्ही युतीचा विचार करणार नाही. आम्ही शिजवलेले तुम्ही आयते खायला बघत असाल, तर ते शक्य नाही.”
धर्म पाहून मतदान करणाऱ्यांनो, तुम्ही धर्मांतर करणार का?:नसाल तर मग RSS, BJPचा मुद्दा खरा आहे का? प्रकाश आंबेडकरांचा मतदारांना सवाल
-
By सुरेश पाचभाई
- December 25, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार:बदल्या, बेकायदेशीर वसुलीचे...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
सोशल मीडियावर अश्लील क्लिप्स टाकणाऱ्यांना धक्का, ग्रुपच्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
पार्थ पवारांना क्लीन चिट देता येणार नाही:राजकारणासाठी...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यात यलो अलर्ट, पुढचे चार दिवस धोक्याचे:मराठवाड्यातील...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात:महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
राज्यभरात राम नवमीचा उत्साह:पुण्यात वाहतुकीतील बदल, काळाराम...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 26, 2026
