ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

राज्यात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे:हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस? वाचा सविस्तर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सोमवारी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सकारात्मक वातावरणातच भारतीय हवामान विभागाने आपला नवा अंदाज वर्तवला असून, त्यानुसार पुढील 48 तासांत संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी असून, अखेर मराठवाड्यासह कोकण किनारपट्टी आणि पुण्यात मान्सून दाखल झाला आहे. काही काळ कोकणात रेंगाळलेला मान्सून आता वेगाने पुढे सरकला असून, तो पुण्यात आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे. मान्सूनच्या या समाधानकारक आगमनामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता दूर झाली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील 10 दिवस हे मान्सूनच्या उर्वरित वाटचालीसाठी अतिशय अनुकूल असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेषतः आगामी 48 तास हे मान्सूनच्या सक्रियतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, या काळात धाराशिव, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसह कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भाला आणखी 3-4 दिवसांची प्रतीक्षा एकीकडे आज नाशिक, नागपूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, दुसरीकडे विदर्भाला मात्र मान्सूनसाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्यातरी विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर चार ते पाच दिवसांनी संपूर्ण विदर्भात दमदार पावसाची अपेक्षा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर