ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

वाशिंबा बायपासजवळील राखेमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात:महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी, स्थानिक नागरिकांची मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वासिंबा बायपासवर राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी नागपूरवरून थेट आणण्यात आलेली राख (फ्लाय ॲश) बोरगाव मंजू येथील वासिंबा बायपास आणि एमआयडीसी जवळील मोठ्या पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली आहे. ही उघड्यावर साठवलेली राख आता परिसरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जीवावर उठली आहे.सध्या सुरू असलेल्या रखरखत्या उन्हात जोरदार हवा सुटल्यामुळे ही राख हवेत मोठ्या प्रमाणावर उडत आहे. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि पादचाऱ्यांना बसत आहे.दुचाकी चालवताना अचानक डोळ्यांत राख गेल्यामुळे केव्हाही मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या राखेच्या प्रदूषणामुळे केवळ वाहनधारकच नव्हे, तर बायपासला लागून असलेल्या संपूर्ण रेणुका नगरातील रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकीकडे शासन स्वच्छ व सुरक्षित जीवनाचा दावा करत असताना, दुसरीकडे मात्र या प्रदूषणामुळे बोरगाव मंजूतील जीवनमान धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक महसूल प्रशासन, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन या राखेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. संबंधित विभागाने ही साठवलेली राख तातडीने उचलून न नेल्यास, त्रस्त नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण करतील, असा इशारा बोरगाव मंजू येथील संतप्त जनतेने दिला आहे. नागरिकांना जडताहेत श्वसनाचे गंभीर आजार हवा सुटताच ही बारीक राख लोकांच्या घरांमध्ये शिरत असून, थेट खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये आणि पिण्याच्या पाण्यात जात आहे. यामुळे लहान मुलांच्या नाकात व घशात राख गेल्याने त्यांना श्वसनाचे गंभीर आजार जडत आहेत. शेतात काम करणारे मजूर, स्थानिक हॉटेल्सच्या किचनमध्येही राखेचे साम्राज्य पसरल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर