बातमी ऐका (Marathi Voice Reader)
गणपतीपुळे: जगभरातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र म्हणून गणपतीपुळे हे ठिकाण ओळखलं जातं. गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी महाराष्ट्रातूनच नाही तर अगदी परदेशातून देखील पर्यटक आवर्जून येतात. याच पर्यटकांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या 60 दिवसांपासून बंद असणारा गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. पावसाचा जोर कमी होत असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन 24 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेत किनारा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसाळ्यात गणपतीपुळे परिसरातील समुद्र अधिक खवळतो. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. याच कारणास्तव 26 जूनपासून समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. आता पावसाचा जोर कमी झाला असून समुद्रकिनाऱ्याचा धोका देखील कमी झाला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे समुद्रकिनारा खुला करण्याची मागणी केली होती.
दीड तास वाया घालवण्याची गरज नाही! मुंबईकरांसाठी नवा मार्ग ठरणार गेमचेंजर; 10 मिनिटांत पोहोचणार, वाचा कसा असेल प्रकल्प?
गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी, 24 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी मागणी लावून धरली. अखेर ग्रामपंचायतीने सोमवारी दुपारपासूनच हा किनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, समुद्रकिनारा खुला करण्याचा निर्णय झाला असला तरी पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात खोल पाण्यात उतरू नये. जीवरक्षक आणि पोलीस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.