बातमी ऐका (Marathi Voice Reader)
India vs Sri Lanka : सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली असून दुसऱ्या मॅचमध्ये देखील भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. देवदत्त पेडिक्कलच्या शतकीय कामगिरीनंतर टीम इंडियाने पहिला डाव 503 धावांवर डिक्लेअर केला. अशातच आता टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरने गौतम गंभीरवर सडकून टीका केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत गंभीरची कोणतीही भूमिका नाही, असं म्हणत माजी चीफ सिलेक्टरने खडे बोल सुनावले.
गंभीरकडे आता काही काम उरलं नाही
श्रीलंका हा टेस्ट क्रिकेटसाठी चांगला संघ नाही आणि त्यांना हरवल्यास गंभीरला खूप आनंद होईल. श्रीलंका वनडे फॉरमॅटमध्ये चांगला आहे पण टेस्टमध्ये नाही. बारक्या टीमला हरवून काय आनंद मिळतो. गंभीरकडे आता काही काम उरलं नाही. पहिल्या कसोटीत 200 हून अधिक धावा केल्यानंतर तुम्ही त्याला संघातून कसं वगळू शकता? गंभीर काहीही म्हणो, त्याच्याकडे आता काही काम उरलं नाही, असंही श्रीकांत म्हणाले आहेत.भारत ही मालिका नक्कीच जिंकेल. श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या संघांविरुद्धच्या विजयानंतर गंभीर खूप आनंदी असेल, असं म्हणत त्यांनी गंभीरवर टीका देखील केली आहे.
पुढील दोन मालिका भारताचे भवितव्य ठरवतील – श्रीकांत
मी गंभीरवर कठोर टीका करत नाहीये. तो एक खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये खेळ समजून घेण्याची क्षमता आहे. त्याला थोडे अधिक संवेदनशील असण्याची गरज आहे. मात्र, एक खेळाडू म्हणून तो खूप चांगला होता, असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील दोन मालिका भारताचे भवितव्य ठरवतील. मला वाटते की दक्षिण आफ्रिका जवळपास अंतिम फेरीत पोहोचली आहे, असंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे.
भारताला नेहमीच संघर्ष करावा लागला – श्रीकांत
दरम्यान, न्यूझीलंडमध्ये भारताला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. 2024 मध्ये भारताने केवळ बुमराहच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या मनात भीती निर्माण केली होती. केवळ त्याच्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाला जवळपास हरवलं होतं. हे विसरू नका की ऑस्ट्रेलियन संघ बुमराहविरुद्ध खेळायला घाबरत होता. तो प्रतिस्पर्धी संघाच्या मनात जी भीती निर्माण करतो ती अविश्वसनीय आहे, असंही के श्रीकांत म्हणाले आहेत.