ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी बोलता आलीच पाहिजे:खतांच्या किमतीत 45 टक्क्यांपर्यंत वाढ, किमती कमी करून तातडीने सबसिडी द्या- अनिल देशमुख

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऑटो-टॅक्सी चालकांना थोडी फार तरी मराठी बोलता आली पाहिजे. आम्ही ते सुद्धा बोलणार नाही अशी कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे. 1 मे पासून हा नियम लागू होणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. 8 ते 10 वाक्य शिकायला 2 दिवसांमध्ये कोणीही शिकू शकतो. महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठी भाषा शिकायला कोणाला अडचण असू नये. त्यांना काही मराठीमध्ये निबंध लिहायला लावणार नाही, ते मान्य केले तर हा प्रश्न सुटू शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अनिल देशमुख म्हणाले की, खताच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. 25 ते 45 टक्क्यापर्यत खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली करण्यात आली आहे. 20-20-0 खताच्या किंमतीमध्ये 25 टक्के तर 24-24-0 खताच्या किंमतीमध्ये जवळपास 23 टक्के वाढ झाली आहे. एमओपीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, अशा पद्धतीने खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारने खतांच्या किमती कमी करत त्यावर सबसिडी दिली पाहिजे. ..तर कारखानदारांवर कारवाई करावी अनिल देशमुख म्हणाले की, खत टंचाई किंवा दरवाढीसाठी कृषी केंद्र चालकांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र मूळ दोषी हे कारखानदार आहेत. खत खरेदी करताना लिंकिंगचा प्रकार केला जावू नये. कारण यामध्ये केवळ कृषी सेवा केंद्रांना दोषी धरले जाते. पण खरे दोषी हे कारखानदार आहेत ते कृषी सेवा केंद्राना लिंकिंग करायला भाग पाडतात. कृषी केंद्रावर कारवाई न करता कारखानादारावर कारवाई केली तर यावर आळा बसेल. कडूंना सल्ला देण्याची आवश्यकता नाही अनिल देशमुख म्हणाले की, बच्चू कडू हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जमिनीवर काम करत आहेत. बच्चू कडू यांना सल्ला देण्याची काही गरज नाही. विधान परिषदेसंदर्भात ते योग्य तो निर्णय घेतील. पक्ष विलीन करण्यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर