बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई: मायानगरी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणरायाच्या दर्शनाला लाखो लोक बाहेर पडतात. विशेष म्हणजे गणपती विसर्जनाला मोठी गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या सोयीसाठी मध्यरेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या मुंबईकरांसाठी 22 विशेष उपनगरीय रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील मुख्य मार्गावर उत्सवातील शेवटच्या तीन दिवशी 18 फेऱ्या चालवण्यात येतील. तर विसर्जनाच्या दिवशी मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर चार फेऱ्या सोडण्यात येतील. त्यामुळे मध्यरात्रीनंतर देखील भाविकांना मुंबईतून ठाणे, कल्याण आणि पनवेलच्या दिशेने प्रवास करता येईल.
Weather Alert: पाऊस इज बॅक! महाराष्ट्रात धुमशान सुरू, रविवारी 24 जिल्ह्यांना अलर्ट
दरम्यान, 23, 24 आणि 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ ठाणेदरम्यान लोकल धावणार आहेत. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर देखील 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर विशेष लोकल फेऱ्यांची सुविधा आहे. या विशेष गाड्यांना मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावरील विशेष फेरी आणि वेळ
सीएसएमटी-कल्याण मध्यरात्री 1.40 वाजता
सीएसएमटी-ठाणे मध्यरात्री 2.30 वाजता.
सीएसएमटी – कल्याण मध्यरात्री 3.25 वाजता.
कल्याण-सीएसएमटी मध्यरात्री 00.05 वाजता
ठाणे-सीएसएमटी मध्यरात्री 1.00 वाजता
ठाणे – सीएसएमटी मध्यरात्री 2.00 वाजता
या सहा फेऱ्या प्रत्येकी तीन रात्री धावणार आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर एकूण 18 विशेष फेऱ्या होतील.
हार्बर मार्गावर विशेष फेऱ्या आणि वेळ (25-26 सप्टेंबर)
सीएसएमटी-पनवेल मध्यरात्री 1.30 वाजता
सीएसएमटी – पनवेल मध्यरात्री 2.45 वाजता
पनवेल – सीएसएमटी मध्यरात्री 1.00 वाजता
पनवेल – सीएसएमटी मध्यरात्री 1.45 वाजता.