महापौरआणि उपमहापौरपदासाठी सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत त्यासाठी मुदत आहे. सोलापूर मनपात 102 पैकी भाजपचे 87 नगरसेवक असल्याने त्यांचाच बिनविरोध महापौर होणार हे निश्चित आहे. पण त्यासाठी पक्षश्रेष्ठी कुणाचे नाव पुढे करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोठे व देशमुख गट आपल्याच उमेदवारांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवार देताना गटबाजी होऊ नये म्हणून पक्षाने व्हीप बजावला. त्यात म्हटले की, ‘पक्षाला न विचारता कोणालाही सूचक वा अनुमोदक होऊ नका.’ कोठे गटाकडून विनायक कोंड्याल व देशमुख गटाकडून किरण देशमुख यांची नावे आतापर्यंत चर्चेत होती. पण आता गटनेतेपदी निष्ठावंत नरेंद्र काळेंची निवड झाल्यानंतर महापौरपदासाठीही गटबाजीऐवजी निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे महिलाआघाडी शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांचेही नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडे पक्षाने सर्व निर्णयाचे अधिकार दिले आहेत. ते कोणाचे नाव पुढे करतात यावर नवा महापौराचे भवितव्य ठरेल. पुन्हा महिलेलाच संधी देण्यावर विचारमंथन विनायक कोंड्याल वकिरण देशमुख यांची नावे चर्चेत असतानाच अचानक रंजिता चाकोते यांच्या नावाची चर्चा सुरु करण्यात आली. कोंड्याल हे आमदार कोठे यांचे भाऊजी आहेत. पण ते निवडणुकीपूर्वीच भाजपात आले आहेत. त्यामुळे आयारामांना संधी द्यायची की नाही यावर पक्षात खल सुरु आहे. दुसरीकडे किरण देशमुख हे आमदार पूत्र आहेत, त्यांना संधी दिली तर घराणेशाहीचा ठपका पक्षावर बसू शकतो. तसेच पुन्हा गटबाजीआणि पक्षांतर्गत संघर्ष आणखी पेटण्याची भीती आहे. यावर उपाय म्हणून कुठल्याही गटात नसलेल्या चाकोते यांचे नाव पुढेआलेआहे. त्या पक्षाच्या महिलाआघाडी अध्यक्षाआहेतच. शिवाय रोहिणी तडवळकर यांच्या निकटवर्तीय आहेत. गेली 10 वर्षे महिलाच महापौर होत्या, त्यामुळे पुन्हा महिलेलाच संधी द्यावी, असा मतप्रवाहआहे. नगरसेवकांना न विचारता उमेदवार जाहीर करणार नगरसेवकांना न विचारताच महापौरपदासाठीच्या उमेदवाराची प्रदेश भाजपमार्फत घोषणा होणारआहे. आतापर्यंत भाजप नगरसेवकांच्या दोन वेळा बैठका झाल्या. 19 जानेवारीला हॉटेलमध्ये व 24 जानेवारीला सारस्वत ब्राह्मण मंगल कार्यालयात बैठक झाली. पण त्यात महापौरपदी कोण उमेदवार असावा, याबाबत नगरसेवकांचे मत नेत्यांकडून विचारण्यात आले नाही. त्यामुळे आता सदस्यांना न विचारताच नाव जाहीर होईल. निष्ठावंत नरेंद्र काळेंची निवड झाल्यानंतर महापौरपदासाठीही गटबाजीऐवजी निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे महिलाआघाडी शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांचेही नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडे पक्षाने सर्व निर्णयाचे अधिकार दिले आहेत. ते कोणाचे नाव पुढे करतात यावर नवा महापौराचे भवितव्य ठरेल.
