बुरांडा व बोटोनीच्या मधातील राज्य महामार्गावरील घटना.
मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई [ 992286218]
सविस्तर वृत्त असे की..
वणी यवतमाळ राज्य महामार्गावरील बुरांडा व बोटोनी च्या मधात धावत्या टाटा एस या गाडीला अचानक आग लागून समोरील कँबिन जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 30 मार्च 2022 रोज बुधवारला सकाळी सुमारे 11वाजताच्या सुमारास घडलीआहे.या घटनेत कुटलीही जिवीतहानी झाली नाही. मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले यश.
मिळालेल्या माहितीनुसार हे वाहन वणी येथून यवतमाळकडे जात असतांना राज्यमहामार्गावरील बुरांडा व बोटोनीच्या मधात अचानक धावत्या वाहनाने पेट घेतली.आग लागताच वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजुला लावून वाहनातून बाहेर पडला.आणि काही वेळातच गाडीचा समोरील भाग पुर्ण पणे आगीने रौद्ररूप धारण केले होते. मारेगाव पोलिसांच्या सतर्केते मुळे गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई नितीन खांदवे व पोलीस वाहन चालक अतुल हिवरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी तात्काळ पोलीस वाहन व अँटोच्या साह्याने थेट बोटोणी येथून पाणी आणून आगीववर नियंत्रण मिळविले आणि टेम्पोचा मागील भाग शाबूत ठेवण्यावर यश मिळविले पण गाडीचा पुडचा भाग जळला आहे.पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे..
