मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु ठेवण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली पटसंख्येची जाचक अट रद्द करण्यात यावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्या कडे पाठविण्यात आले आहे.
शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरु ठेवण्यासाठी 0 ते 20 पटसंख्या अनिवार्य केली आहे. ज्या शाळाची पटसंख्या 20पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करण्या बाबतचा अध्यादेश धडकल्याने ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ग्रामीण भागातील आदिवासी पोडावर ही संख्या दुर्मिळ आहे.
त्यामुळे अशा शाळा बंद करण्यासाठी शासन निर्णयाची अमलाबजावणी सुरु करण्यात येत असल्यामुळे आदिवासी विदयार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार आहे. पोडावरून समाविष्ट करण्यात येणाऱ्या दूरच्या शाळेत या विदयार्थ्यांना ये- जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. अपुऱ्या सुविधे मुळे चिमुकले विदयार्थी शिक्षण या मूलभूत हक्का पासून वंचीत राहणार आहे.
त्यामुळे शासनाने ही जाचक अट रद्द करून पूर्ववत या शाळांना राजश्रय द्याव्या अन्यथा या निर्णयाचे विरोधात उलगुलान पुकारला जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष सुमित गेडाम उपाध्यक्ष गंगाधर लोनसावळे, कार्याध्यक्ष भैय्याजी कनाके, सचिव शंकर मडावी, मारोती आडे,भाऊराव मेश्राम,मंगेश उईके,प्रवीण वणकर,बबन झोटिंग, कवडू जुमनाके, लक्ष्मण कोसरकार, आनंद मांदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
