Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी निधीचा वाटप ताबडतोब करा – शेतकऱ्यांची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील जुलै – ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.महापूर व अतिवृष्टी झाली सगळीकडे नदी व नाल्याना ओसांडून पूर आलेला होता.

या मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते अनेक शेतकऱ्याची शेती ही पुराणे खरडून नेली आहे.अतिवृष्टी मुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला म्हणून शासनाने तहसील कार्यालयाकडे निधी वर्ग केला असताना मात्र कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे या शेतकऱ्यांना निधीचा वाटप करण्यात आलेला नाही.

नुकसान ग्रस्त शेतकरी तहसील कार्यलयाकडे निधी प्राप्त होऊनही प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही.अमलाबजावणी करणाऱ्या यंत्रनेच्या उदासीन धोरणाचा फटका दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यानी दिलासा द्यावा अशा आशयाची मागणी करणारे निवेदन दुष्काळ ग्रास्तानी तहसीलदार दीपक पुंडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कडे पाठविण्यात आले आहे.

निवेदनावर कांग्रेसचे नगरसेवक नंदेश्वर आसुटकर,अंकुश माफूर, रवी पोटे,पांडुरंग कापसे, अंबादास मुसळे, छत्रपती कुमरे, गजू कोरझरे, अशोक अस्वले, वसंता वरणे, तुळशीराम वरदे, गनपत तेलगुंजी दिलीप आत्राम पोतु बोन्दरे, वासुदेव लोणसावले, ज्ञानेश्वर कोरझरे, कलाबाई कोरझरे,विजय कापसे यांचे सह अनेकांच्या सह्या आहेत.





Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!