– अनेकांचे अश्रूंना अनावर-नियतीने केले चार मुलांना पोरके.
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगांव येथील रफीक व युसूफ हे दोन सख्खे भाऊ होते रफीक भाई हे ऑटोमोबाईलचा व्यवसाय करायचे तर युसूफ भाई थंड पेयाची एजन्सी सह शेती करत होते.व ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.पण नियतीच्या मनात काय असते हे कुणालाच माहिती नसते.
कोणी असे अवेळी अचानक या जगातून निघून जाणे ही मनाला चटका लावून जाणारी घटना काल दिनांक 23 जुन 2023 रोज शुक्रवारला घुग्गुस-चंद्रपूर महामार्गावर घडली.असुन काल ते राजुरा येथुन चंद्रपूर-घुग्गुस मार्गे मारेगांव कडे परत येत होते पण रस्त्यात त्यांच्या बोलेरो वाहनाचा चिंचाळा-नागाळा गावाच्या सुमारास अपघात होऊन चौघे ही ठार झाले होते.
या भीषण अपघातात मारेगाव येथील एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या अर्धांगिनी असे चार व्यक्ती घटनास्थळीच ठार झाल्याने मारेगांव शहरासह संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

रफीक भाई यांचा मुलगा जावेद हा मुंबईत अभियंता तर मुलगी मुस्कान ही चंद्रपूर येथे एमबीए करतेय.युसूफभाई यांची मुलगी सानिया ही नीटची तयारी करीत आहे तर दुसरी मुलगी तंनवुर ही बी फॉर्म करत आहे.या चारही बालकांच्या आई-वडीलावर काडाने झडप घातल्याने ही बालके पोरकी झाली आहे.
कालच्या त्या घुग्गुस-चंद्रपूर महामार्गावरील बोलेरो अपघातात ठार झाले त्यांचे पार्थिवावर काल चंद्रपूर येथे उत्तरीय तपासणी प्रक्रिया पुर्ण करून रात्री 9 वाजताच्या सुमारास पार्थिव मारेगाव येथे आणन्यात आले.यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांचा आक्रोशाने अनेकांचे अश्रू अनावर झाले होते.
आज दिनांक 24 जुन 2023 रोज शनिवारीला सकाळी 11 वाजता त्यांचे 4 ही पार्थिव अंतविधि साठी निघाले तेव्हा असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी कब्रस्तान कडे कुच केले व चारही पार्थिवांना मुस्लिम रितीरिवाजाने अंतिम विदाई देण्यात आली.
