वर्धा नदीवरील कोसारा (सोईट)  पुलावरून तीन फूट पाणी.

यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले गाव कोसारा (सोईट) या गावाच्या कडेला असलेल्या वर्धा नदीच्या पुलावरून आज दिनांक 13 जुलै 2022 रोज बुधवार ला पहाटेच्या सुमारास पुर आल्याने पुलावरून तीन फूट पाणी वाहत आहे.या मार्गाने मारेगाव तालुक्यातील नागरीक मोठ्या प्रमाणात खैरी ते कोसारा (सोईट)या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात जाण्यासाठी शॉटकट असल्याने रहदारी असते.

पण पुलावरुन पाणी वाहत असल्याने आता यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे त्यामुळे आज सकाळी या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना  पुलावरून वापस जावे लागले आहे. त्या मूळे या मार्गाने सध्या पुलावरुन पाणी कमी होत नाही तोपर्यंत कोणीही जावु नये.

Leave a Comment

error: Content is protected !!