ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास मनसे स्टाईलने आंदोलन

182 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील पत्रकार परिषदेत राजू उंबरकर यांनी केली घोषणा

सुरेश पाचभाई मारेगाव,

शेतकऱ्यांसमोर सध्या विविध समस्या आहे. त्या सुटण्याचे नाव घेत नाही. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्यांच्या प्रश्नाची साधी दखलही घेत नाही. शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी दिला.ते मारेगाव येथील विश्रामगृहामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मारेगाव तालुक्यात विजेचा मोठया प्रमाणावर लपंडाव सुरु आहे. शेतीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी पेरणीही केलेली आहे.पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.अशातच शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे.पण काहींचे विजेचे कनेक्शन कापलेले आहे. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले आहे. काही ठिकाणी तार तुटलेले आहे. या व अशा अनेक समस्यांमुळे आणि वीज प्रवाह बंद असल्यामुळे शेतकरी ओलीत करू शकत नाही.

वनोजादेवी येथील प्रस्तावित नवीन उपकेंद्र अजूनही धुळखात आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे तर पदाधिकारी मूग गिळून गप्प आहे. तालुक्यातील किती पांदन रस्त्याचे प्रस्ताव शासन दरबारी गेले हे कोणालाही माहिती नाही.तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरु आहे.चढया भावाने बियाण्यांची विक्री सुरु आहे. लिंकिंगच्या नावाखाली बोगस बियाणे देणे, खतसोबतही लिंकिंग असल्यामुळे शेतकऱ्यांवर विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.

सरकार आणि नेते मंडळी डोळे लावून याकडे पाहत आहे. मनसे मात्र गप्प बसणार नसून जोडे मारो आंदोलन किंवा न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी सर्वकाही करण्यात येईल असा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला.यावेळी संतोष रोगे,रुपेश ढोके,धनंजय त्रिंबके,नबी शेख,उज्वला चंदनखेडे,उदय खीरटकर, किशोर मानकर, शुभम भोयर, जम्मू खान उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर