Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा स्तुत्य उपक्रम

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:- जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते.प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ०४ जानेवारी २०२५ ते दि. १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येत असते.याचाच उपक्रम म्हणून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आज दि.१८ जानेवारी२०२५ रोज शनिवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी.६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून “रक्तदान महायज्ञास” हातभार लावला.यावेळी श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथील टीमने रक्त संकलनाचे कार्य केले.आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल,अनेमिया,हिमोफिलीया, पॅलेसेमिआ,ब्लड कॅन्सर,किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते.

यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे.आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त ५ मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत.तरी आपल्या व्यस्त दिनचर्येतून संस्थेसाठी आपला बहुमोल वेळ काढून ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे रक्तदान करण्यास येवून या सामाजिक कार्यात सहभागी होवून उपकृत करावे असे आवाहन संस्थानतर्फे कर करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळून ४८ तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरुन निघते. रोग प्रतिकार शक्ती वाढते. नियमित ३-४ महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, होण्याचे प्रमाण कमी होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!