श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील दादासाहेब येलम यांच्या पेरू फळबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. यापार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. तर दुसरा बिबट्या कोपरगाव तालुक्यात पडेगाव येथे, जेरबंद झाला. श्रीरामपूर वन विभाग तसेच वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीम यांच्याशी संपर्क साधला. यानंतर वनविभागातील वनरक्षक अक्षय बडे, वनपाल विलास डगळे, रेस्क्यू टीमचे प्राध्यापक रोहित बकरे, तुषार बनकर, आजित परांडे, सार्थक शिंदे व अक्षय अभंग आदींनी माग काढून पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या अडकला. कोपरगाव तालुक्यातील निमगाव खैरी येथे अण्णासाहेब शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. सोमवारी (१५ डिसेंबर) सात वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. दीपक कांबळे | अहिल्यानगर जंगलातील बिबटे ऊसात, स्थिरावले अन् आता ते थेट घरापर्यंत येऊन आपल्याच लेकरांना उचलून नेत आहेत. ही गंभीर स्थिती संतापजनक आहे. मागील तीन वर्षांत झालेल्या हल्ल्यांचा आकडा पाहता, मागील आठ महिन्यांत सर्वाधिक १० मृत्यू झाले. दारात खेळणारी मुले, शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिला व शेतकऱ्यांना बिबट्यांकडून लक्ष केले जात आहे. त्यामुळे कृषीप्रधान जिल्ह्यातली शेती उध्वस्त होण्याची धास्ती आहे. वाढता संताप अन् विरोध पाहता, वनविभागाकडून हल्लेखोर बिबट्यांची धरपकड सुरू आहे. एक नरभक्षक ठार केला असून, विविध ठिकाणांहून रेस्क्यू केलेल्या बिबट्यांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ९७० गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे, हे बिबटे जंगल क्षेत्रात नव्हे, तर लोकवस्तीवर तसेच शेतात वास्तव्य करत आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार लावलेल्या पिंजऱ्यातही बिबटे जेरबंद होत आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे १७ बिबटे जेरबंद झाल्याचे समोर आले. त्यात अहिल्यानगर तालुक्यात कर्जुने खारे २, तपोवन १, पारनेर तालुक्यात २, मिरजगाव १, संगमनेर १, श्रीरामपूर ४, कोपरगाव ३, राहुरी ४, ठार १, याव्यतिरिक्त जखमी आढळून आलेले बिबटे ताब्यात घेतले असून, ही संख्या वाढती आहे. दरम्यान, एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बिबट्यांनी केलेल्या ३३ गंभीर हल्ल्यांच्या घटनेत १० मृत्यू व २३ गंभीर जखमी झाले आहेत. कुठे किती बिबट्यांचा मुक्काम {संगमनेर : 4 {अकोले : 20 {राहुरी : 10 ^ जेरबंद झालेले बिबटे वनताराकडे पाठवण्याबाबत आपण यापूर्वीच प्रस्ताव दिला आहे. त्यानंतरही हल्ल्याच्या घटना सुरू असून बिबटे जेरबंद केले जात आहेत. बिबटे स्थलांतरासाठी नाशिकमार्फत नागपूर कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे. सद्यस्थितीत सुमारे ३४ बिबटे वनविभागाकडे झाले आहेत. धर्मवीर सालविठ्ठल, उपवन संरक्षक. . २०२३-२०२४ – ४ (३३ जखमी) . २०२४-२०२५ – ८ (४७ जखमी) . २०२५-२०२६ – १० (२३ जखमी) लालफितीत अडकलाय स्थलांतराचा प्रस्ताव जिल्ह्यात विहिरीत पडून अथवा अपघातात जखमी होऊन बचावलेले बिबटे, जेरबंद झालेले बिबटे संबंधित क्षेत्रीय कार्यायात ठेवण्यात आले आहेत. या बिबट्यांची संत्या ४० पर्यंत पोहोचली. पहिल्या टप्प्यात २३ बिबटे वनताराला पाठवण्याबाबत नागपूर प्रधान वनसंरक्षकांकडे प्रस्ताव महिनाभरापूर्वीच पाठवला. परंतू, हा प्रस्ताव लालफितीत अडकला असून, त्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे हे बिबटे रेस्क्यू सेंटरविना जिल्ह्यात ठेवावे लागत आहेत.
जिल्ह्यात आठ महिन्यात बिबट्यांकडून 33 जीवघेणे हल्ले:10 जणांचा मृत्यू, 34 बिबट्यांचा वनविभागांत मुक्काम, महिनाभरात 17 बिबटे जेरबंद
-
By सुरेश पाचभाई
- December 17, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
फडणवीसांकडून नितेश-नीलेशचं जोरदार कौतुक:नारायण राणेंच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांच्या...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव:महात्मा फुलेंनी त्या काळी...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
‘ऑपरेशन टायगर’च्या बातमीने ठाकरे गटात अस्वस्थता:बातमी देणाऱ्या...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला:पायलटने हेलिकॉप्टर...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 11, 2026
