नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उतरवणाऱ्या भाजपला मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले असून, या सहाही उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. घराणेशाहीला थारा न देता मतदारांनी लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, केवळ नगराध्यक्षपदच नव्हे तर नगरसेवक पदाच्या इतर पाच जागांवरही त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली होती. सातत्याने घराणेशाहीवरून काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या भाजपची ही कृती म्हणजे घराणेशाहीचा कळस असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. भाजपच्या या ‘कौटुंबिक’ उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यात खालील सदस्यांचा समावेश होता: अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला धक्का माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात असताना, एकाच कुटुंबाला 6 जागा देण्याच्या निर्णयामुळे चव्हाणांवर नामुष्की ओढवली आहे. इच्छुकांची संख्या मोठी असतानाही केवळ एकाच घराण्याला प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी मतपेटीतून बाहेर आल्याचे दिसत आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षाची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र लोहा येथील निकालाने त्यांच्या जिल्ह्यावरील पकडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शरद पवार गटाची बाजी, चिखलीकरांनाही झटका लोहा हा भाग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातील तिरंगी चुरशीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवून बाजी मारली आहे. चिखलीकरांच्या बालेकिल्ल्यात आणि अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यात पवारांच्या राष्ट्रवादीने मिळवलेला हा विजय आगामी विधानसभेसाठी महत्त्वाचे संकेत देणारा ठरला आहे. हे ही वाचा… परळीत भाजप-राष्ट्रवादी युतीचा विजय:आजचा निकाल परळीला बदनाम करणाऱ्यांच्या तोंडात लगावलेली चपराक – धनंजय मुंडे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि रिपाइंच्या महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, अंबाजोगाई आणि गेवराईतही भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. या विजयानंतर बोलताना आमदार धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी जनतेचे आभार मानत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सविस्तर वाचा…
घराणेशाहीला जनतेने नाकारले:अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये भाजपच्या एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांचा केविलवाणा पराभव, शरद पवार गटाची सरशी
-
By सुरेश पाचभाई
- December 21, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला:पाचव्या गुन्ह्यात 5...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 19, 2026
नाशिक TCS प्रकरणातील पीडितेची आपबीती:म्हणाली – आरोपीने...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 19, 2026
विरोधकांच्या ताकदीपुढे मोदी सरकार अक्षरशः थंड पडले:भाजपची...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 19, 2026
