ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय?:सुनील तटकरेंचा भरत गोगवलेंना टोला, महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रायगड जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. अलिबाग, महाड आणि विशेषतः तटकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीने शेकापने राष्ट्रवादीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. या निकालानंतर आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय? असे म्हणत तटकरे यांनी गोगवले यांना टोला लगावला आहे. सर्वात मोठा उलटफेर श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाला, जो मंत्री आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवलेले अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातनाक यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा केला. दुसरीकडे, महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपला गड राखला असून, शिवसेनेच्या सुनील कविसकर यांनी राष्ट्रवादीच्या सुदेश कळमकर यांचा पराभव केला आहे. श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी मंत्री भरत गोगावले स्वतः पोहोचले होते. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या पराभवानंतर गोगावलेंनी विरोधी गटाच्या उमेदवाराचे स्वागत केल्याने सुनील तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय? – सुनील तटकरेंचा टोला भरत गोगावले यांच्या भूमिकेवर टीका करताना सुनील तटकरे यांनी ग्रामीण म्हणीचा आधार घेत जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, गेल्या अडीच-तीन वर्षांपासून जे लोक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते, तेच आज त्यांच्या विजयाचे स्वागत करायला उभे आहेत. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, ‘पाचवी कोणाकडे चालते आणि घुगऱ्या कोण करते’. ज्यांच्याकडे मयती आहे, तेच घुगऱ्या करत आहेत आणि ज्यांची पाचवी आहे त्यांचं वेगळंच काही सुरू आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, जे उमेदवार मशालीवर निवडून आले आहेत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी महाडवरून लोक श्रीवर्धनला जात आहेत, हे अनाकलनीय आहे. या विधानामुळे रायगडच्या राजकारणात महायुतीमधील विसंवाद आता उघड झाला असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर