भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ निवडणुकीचा फंडा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही हे 4 वर्षांच्या पोरालाही कळते. उद्धव ठाकरे यांची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. या घिसीपिटी कॅसेटला आता कुणीही विचारत नाही, असे ते म्हणालेत. उद्धव व राज ठाकरे यांनी आज आपल्या राजकीय युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईला महाराष्ट्र, मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा आहे हे जनतेला माहिती झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाच्या 4 वर्षाच्या पोराला सुद्धा कळते व महाराष्ट्राच्या जनतेलाही कळते की, मुंबई ही महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. हे कुणीही करू शकत नाही. उद्धव ठाकरेंची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. त्या घिसीपिटी कॅसेटला आता कुणी विचारत नाही. व्होटचोरी व मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे या दोन गोष्टी आता लोकांना पटत नाही. त्यांनी कितीही निवडणुकीचा मुद्दा बनवला, तरी उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक निवडणुकीत असे बोलतात त्याला काही अर्थ नाही. ठाकरेंना स्वतःची माणसे सांभाळता येत नाही ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वतःची माणसे सांभाळता येत नाहीत. त्यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाहीत. म्हणून ते या पद्धतीने बोलत आहेत. जनतेचा व कार्यकर्त्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी स्वतःच संपवला आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते व नेते त्यांना सोडून गेलेत. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्याला लोकांनी का सोडले. आपल्याला आमदारांनी का सोडले, आपल्याला गावोगावचे लोकं का सोडत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज एवढी परिस्थिती वाईट आहे की, नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठीही त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे मुंबई तोडण्याचा मुद्दा गौण ठरणार आहे. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात भावनिक राजकारण चालणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात भावनिक आवाहन चालणार नाही. जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही. महाराष्ट्रातील जनता सुजान आहे. विकसित मुंबईलाच मतदान करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र व विकसित मुंबई करू शकतात. हे मराठी माणसांना व मतदारांना माहिती आहे. आम्ही सर्वजण मराठी माणसे आहोत. आम्ही इंग्रजी लोकं आहोत का? आम्ही लंडनहून इकडे राहण्यासाठी आलोत का? आम्ही महाराष्ट्राचे मराठी माणसे आहोत. महायुतीमधील सर्वच लोकं मराठी माणसे आहेत. त्यामुळे मराठी- मराठी करून तुम्ही मराठी भाषेचाही अपमान केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान तुम्ही केला. त्यामुळे काहीही होणार नाही. मतदान भावनेच्या मुद्यावर होणार नाही. खरे तर हे मतदान विकसित मुंबईसाठी होणार आहे. त्यामुळे काहीही सांगितले तरी, फार वाट लागणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे एवढीच मते मिळणार आहेत. संजय राऊतांचाही घेतला समाचार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परप्रांतीयांना मुंबईकर म्हणण्यासंबंधी विधान केले आहे. त्याचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, त्यांनी आतापर्यंत केवळ डिवचण्याचे काम केले. पण आता निवडणुकीसाठी त्यांनी भूमिका बदलली. आतापर्यंत उत्तर भारतीय कसे खराब आहेत, मुंबई कशी खराब झाली, मुंबईचा कसा सत्यानाश झाला हे ते उत्तर भारतीयांना जोडून म्हणाले. पण आता मतदानासाठी असे बोलत आहेत. ते रंग बदलणाऱ्या सरड्यांसारखे बोलत आहेत, असे ते म्हणाले.
ठाकरे बंधूंची युती ही निवडणूक फंडा:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे ही घिसीपिटी कॅसेट झाल्याची टीका
-
By सुरेश पाचभाई
- December 24, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
पर्यावरणपूरक होळीचा जागर; शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळात...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
मारेगावात ‘सुक्या फुलांच्या कलाकृती’वर राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांचा चोप:कपडे फोटपर्यंत...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
आखाती देशात युद्धाचा भडका:परदेशात महाराष्ट्राचे हजारो नागरिक...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
अपघात प्रकरणी कुटुंब एकवटलं:कंपनी मालकाचा झोपलेला व्हिडीओ;...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
