ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

ठाकरे बंधूंची युती ही निवडणूक फंडा:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे ही घिसीपिटी कॅसेट झाल्याची टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ निवडणुकीचा फंडा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही हे 4 वर्षांच्या पोरालाही कळते. उद्धव ठाकरे यांची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. या घिसीपिटी कॅसेटला आता कुणीही विचारत नाही, असे ते म्हणालेत. उद्धव व राज ठाकरे यांनी आज आपल्या राजकीय युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईला महाराष्ट्र, मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा आहे हे जनतेला माहिती झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाच्या 4 वर्षाच्या पोराला सुद्धा कळते व महाराष्ट्राच्या जनतेलाही कळते की, मुंबई ही महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. हे कुणीही करू शकत नाही. उद्धव ठाकरेंची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. त्या घिसीपिटी कॅसेटला आता कुणी विचारत नाही. व्होटचोरी व मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे या दोन गोष्टी आता लोकांना पटत नाही. त्यांनी कितीही निवडणुकीचा मुद्दा बनवला, तरी उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक निवडणुकीत असे बोलतात त्याला काही अर्थ नाही. ठाकरेंना स्वतःची माणसे सांभाळता येत नाही ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वतःची माणसे सांभाळता येत नाहीत. त्यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाहीत. म्हणून ते या पद्धतीने बोलत आहेत. जनतेचा व कार्यकर्त्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी स्वतःच संपवला आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते व नेते त्यांना सोडून गेलेत. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्याला लोकांनी का सोडले. आपल्याला आमदारांनी का सोडले, आपल्याला गावोगावचे लोकं का सोडत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज एवढी परिस्थिती वाईट आहे की, नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठीही त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे मुंबई तोडण्याचा मुद्दा गौण ठरणार आहे. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात भावनिक राजकारण चालणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात भावनिक आवाहन चालणार नाही. जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही. महाराष्ट्रातील जनता सुजान आहे. विकसित मुंबईलाच मतदान करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र व विकसित मुंबई करू शकतात. हे मराठी माणसांना व मतदारांना माहिती आहे. आम्ही सर्वजण मराठी माणसे आहोत. आम्ही इंग्रजी लोकं आहोत का? आम्ही लंडनहून इकडे राहण्यासाठी आलोत का? आम्ही महाराष्ट्राचे मराठी माणसे आहोत. महायुतीमधील सर्वच लोकं मराठी माणसे आहेत. त्यामुळे मराठी- मराठी करून तुम्ही मराठी भाषेचाही अपमान केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान तुम्ही केला. त्यामुळे काहीही होणार नाही. मतदान भावनेच्या मुद्यावर होणार नाही. खरे तर हे मतदान विकसित मुंबईसाठी होणार आहे. त्यामुळे काहीही सांगितले तरी, फार वाट लागणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे एवढीच मते मिळणार आहेत. संजय राऊतांचाही घेतला समाचार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परप्रांतीयांना मुंबईकर म्हणण्यासंबंधी विधान केले आहे. त्याचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, त्यांनी आतापर्यंत केवळ डिवचण्याचे काम केले. पण आता निवडणुकीसाठी त्यांनी भूमिका बदलली. आतापर्यंत उत्तर भारतीय कसे खराब आहेत, मुंबई कशी खराब झाली, मुंबईचा कसा सत्यानाश झाला हे ते उत्तर भारतीयांना जोडून म्हणाले. पण आता मतदानासाठी असे बोलत आहेत. ते रंग बदलणाऱ्या सरड्यांसारखे बोलत आहेत, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर