ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

रामदास आठवलेंचा मुंबईत ‘राजकीय बॉम्ब’:महायुतीने डावलल्याने 39 उमेदवार रिंगणात उतरवले, भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच, महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’आठवले गटाने बंडाचे निशाण फडकवले आहे. “भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) आमच्याशी विश्वासघात केला आहे,” असा घणाघाती आरोप करत रामदास आठवले यांनी मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. रिपाईने आज 39 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, मुंबईत दलित मतांच्या विभाजनामुळे भाजप-शिंदे सेनेची डोकेदुखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या नेत्यांनी रिपाइंला ७ जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर चर्चाही झाली होती. मात्र, भाजपने 137 आणि शिवसेनेने 90जागांची घोषणा केली, पण या यादीत रिपाईच्या एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही महायुतीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रामदास आठवले यांनी आक्रमक पवित्रा घेत, आपल्या पक्षाच्या 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. का वाढणार महायुतीची डोकेदुखी? मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत. विशेषतः ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि चेंबूर-भांडुप पट्ट्यात रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. आजवर ही मते महायुतीच्या पारड्यात पडत होती. मात्र, आता रिपाईने 39 उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दलित मतांचे विभाजन अटळ आहे. मुंबईच्या निवडणुकीत जिथे 100-200 मतेही जय-पराजयाचे गणित बदलू शकतात, तिथे रिपाइंचा हा ‘स्वबळ’ पॅटर्न भाजप-सेनेसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता मागे हटणार नाही – रामदास आठवले प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, “आम्ही शेवटपर्यंत संयम राखला. 7 जागांची आमची माफक मागणी होती, पण आम्हाला झुलवत ठेवण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळेच आम्ही मुंबईच्या अस्मितेसाठी आणि आमच्या हक्कासाठी 39 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.”
रिपाइं आठवले गटाची मुंबईतील उमेदवारांची यादी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर