भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निर्णयाबाबत आपले मत व्यक्त करताना हा निर्णय घाईत घेतल्याचे सूचित केले आहे. अजित पवार जाऊन अवघे चार दिवस झाले असतानाच शपथविधीचा निर्णय घेण्यात आला, यावर आपण फारसे भाष्य करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, यामागे काही तांत्रिक अडचणी असू शकतात किंवा एखादी राजकीय रणनीती आखलेली असू शकते, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तरी भाजपला कोणतीही अडचण नाही. ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल आणि एकत्र आले नाहीत तरी अजित पवारांचा गट आमच्यासोबत आहे, असे त्यांनी सांगितले. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय असून त्यावर त्यांनीच निर्णय घ्यावा, असे मत महाजन यांनी व्यक्त केले. जर दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता असती, तर शरद पवारांना शपथविधीचे निमंत्रण दिले गेले असते, असेही ते म्हणाले. धावपळीमध्ये आणि छोटेखानी स्वरूपाचा कार्यक्रम असल्याने सर्वांना आमंत्रण दिले नसेल, असेही त्यांनी नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बाहेरून कोणालाही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. शपथविधीला घाई झाली सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निर्णयाला घाई झाली आहे. अजित पवार जाऊन 4 दिवस झाले आणि हा निर्णय घेण्यात आला यावर मी काय बोलणार पण काही तांत्रिक अडचणी असतील किंवा राजकीय रणनीती असेल त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल असे म्हणत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी मी जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दोन्ही गट एकत्र आले तर आनंदच गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र झाले तरी आम्हाला काही वाटायचे कारण नाही. ते एकत्र झाले तरी आम्हाला आनंदच आहे. नाही झाले तरी ते आमच्यासोबत आहे. तो शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांचा विषय आहे त्यांनी ठरवावे आम्हाला काहीही अडचण नाही. राष्ट्रवादीला निर्णय घ्यायचाय गिरीश महाजन म्हणाले की, शरद पवारांना आजच्या शपथविधीबद्दल काही माहिती नाही हा प्रश्न अजित पवार यांच्या गटाचा विषय आहे. त्यांच्या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत काय सुरू आहे याबद्दल कुणालाही कल्पना नाही. समजा एकत्र होण्यासारखे काही असते तर त्यांनी त्यांना आमंत्रण दिले असते. पण धावपळीमध्ये आणि छोटेखानी हा कार्यक्रम असल्याने सर्वांनाच तिथे बोलवले असेल असे मला वाटत नाही. पण तरीसुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत विषय आहे त्यांनी ठरवायचे आहे की काय करायचे आणि काय नाही.
