Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मुंबईत मरीन ड्राईव्हवर भयंकर अपघात:भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह 3 जण ठार; सिग्नलकडे दुर्लक्ष करणे भोवले

भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना सोमवारी पहाटे मुंबईतील मरीन ड्राईव्हवर घडली. दुचाकी चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी पहाटे 5.40 च्या सुमारास एन. एस. रोडवरील पारसी जिमखाना जंक्शन सिग्नलवर घडली. दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगात चालवत होता. त्याच्यासोबत एक महिलाही मागे बसली होती. दुचाकीस्वाराने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्त्याने चालणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला व पुरुषासह पादचारी या तिघांचाही मृत्यू झाला. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे घडला हे ही यासंबंधी तपासले जात आहे. पण दुचाकी चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. नेमकी काय घडली घटना? मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर या भागातील अनेक नागरीक दररोज मॉर्निंग वॉकला येतात. त्यानुसार, एक वृद्ध व्यक्ती सोमवारी पहाटे याठिकाणी वॉकला आले होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने (MH 01 EL 6366) त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर हीच दुचाकी पुढे जाऊन इतर दोन स्कुटींना धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघे व पादचारी वृद्ध असे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लगतच्या जे टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. एन एस रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावर पहाटे ही घटना घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था काहीशी विस्कळीत झाली. पण पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून ती सुरूळीत केली. मृतांची ओळख अद्याप पटली नाही. पोलिसांचे वेग मर्यादा पाळण्याचे आवाहन मरीन ड्राईव्ह पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यासंबंधी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अपघाताचा नेमका घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी गाड्यांचा वेग प्रचंड असतो. ‘स्पीड थ्रिल’च्या नादात अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हे ही वाचा… बिर्याणी आणि कलिंगड खाणे बेतले जीवावर:विषबाधेमुळे अख्खे कुटुंब संपले, दोन चिमुरड्यांसह आई-वडिलांचा अंत; मुंबईतील घटना
मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या भीषण विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण दक्षिण मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!