राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार होते, हे 2000% सत्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा केला आहे. अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विरणीकरणाची चर्चा सुरू होती, असा दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज राजकारणावर बोलणे योग्य नाही. आम्ही अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. अशावेळी अपघात कसा झाला? काय झालं? याविषयी प्रश्न विचारणे किंवा बोलणे देखील योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार होते, हे 2000% खरे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता आजपर्यंत झालेला नाही. त्यांची निर्णय क्षमता आणि काम करण्याचा हातोटी, होती असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. कोणताही निर्णय घेण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राज्यात सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. देवेंद्र फडणवीस किंवा अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर काहीही बोलण्याची जितेंद्र आव्हाड यांनी नकार दिला आहे. मात्र राष्ट्रवादीचे विलनीकरण होणार होते, दोन हजार टक्के सत्य असल्याचा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मात्र, आता या संदर्भातले निर्णय हे राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. नेमकं काय होणार? दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
