“तुम्ही इथे हजर आहात व विरोधक इथे हजर नाहीत म्हणून घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, मरवडे बायपास प्रश्नात गावाच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करेन,” अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. त्या, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाला भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ ए च्या रुंदीकरण व प्रस्तावित बायपास संदर्भातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेत सर्व वस्तुस्थितीचा आढावा घेतला. त्याप्रसंगी मरवडे येथील सिंहगड महाराज मंदिरासमोर बोलत होत्या. या प्रस्तावित बायपासमुळे गावातील मुख्य बाजारपेठेवर परिणाम होऊन व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बायपास न करता गावातून जाणाऱ्या विद्यमान रस्त्याचेच रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी मरवडे येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित ठिकाणांची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी विविध सूचना मांडत गावाच्या हिताचा निर्णय घेण्याची विनंती केली. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मरवडे गावातील बाजारपेठ, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. रस्त्याचे काम करताना सुरक्षित, व्यवहार्य आणि गावाच्या विकासाला पूरक होईल असा मार्ग काढण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांशी चर्चा केली जाईल. सर्व वस्तुस्थिती समजावून घेऊन गावकऱ्यांच्या मागण्या आणि भावना लक्षात घेऊन गावाच्या हिताचा योग्य निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, युवा नेते धन्यकुमार पाटील, प्रदेश चिटणीस ॲड. रवीकरण कोळेकर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मरवडे गावातील ग्रामस्थांनी नुकतीच खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ एच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, हा महामार्ग गावातून न नेता बायपास मार्गाने नेण्याचे नियोजन असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती. बाजारपेठ व रोजगारावर परिणाम होण्याची भीती
