काँग्रेस-उबाठा, शिंदेंच्या उमेदवारांना मतदान केले तर काय फायदा:त्यांच्याकडे निधी देणारे कोण? भाजपच्या नीतेश राणेंचा सवाल

देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहे. तुमच्या परिसराचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचीच सत्ता लागेल. या भागात निधीसाठी आपण निवडणूक लढवण्याची गरज पडते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना मतदान केले तर निधी मिळेल ज्यांच्याकडे सत्ताच नाही त्यांना मतदान केले तर त्यांच्याकडून कामे होणार आहेत का? उद्या अन्य पक्षाचे उमेदवार निवडून गेले तर त्याचा काय उपयोग कोण आहे त्यांच्याकडे असा सवाल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. नीतेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री, पंतप्रधान, ग्रामविकास मंत्री, अर्थखाते आमच्याकडे म्हणजे निधी देण्याचा अधिकार असलेले सर्व लोकं आमच्या पक्षाचे आहेत. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आमच्या पक्षाचे असले पाहिजे. कारण तुमच्या भागाचा विकास करण्याची क्षमता आणि पाहिजे तेवढा निधी देण्याची क्षमता आमच्याकडे आहे. उबाठा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडून दिल्याने काय फायदा होणार आहे? त्यांच्या पक्षाकडे कोण आहे? ज्या ज्या ठिकाणी निधीचा विषय येतो तिथे भाजपचे नेते आहेत निधी देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे नीतेश राणे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती भाजपकडे असेल तर विकासाला चालना मिळू शकेल. तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देण्याचे काम करू. या भागाच्या विकासाची जबाबदारी माझाी असेल. बाकीच्या पक्षांकडे काही अधिकारच नाही, सरकारमध्ये निधी वाटण्याचे आणि देण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. राज्यातील कोणत्याही कामांना मुख्यमंत्र्यांची मान्यता जोपर्यंत मिळत नाही तो एकही रुपयांचा निधी मिळू शकत नाही. माझे जेवढे लक्ष माझ्या मतदारसंघात असणार आहे तेवढचे लक्ष राधानगरीमध्ये सुद्धा असणार आहे. त्यांच्याकडे निधी द्यायला कोण? नीतेश राणे म्हणाले की, उर्वरित पक्षांचे सर्व लोकं येतील मोठी मोठी भाषणे करतील पण त्यांच्याकडे तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी काहीही नाही. उबाठा, काँग्रेसवाले अमेरिका की पाकिस्तान कुठून निधी आणणार. त्यांची लायकी आहे का निधी देण्याची? त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे निधी देण्याची हिंमत आहे का? त्यांना माझ्या स्टाईलने प्रशन विचारा. की तुमची सत्ता नाही तर तुम्हाला काय गोट्या खेळायला मतदान करावे का असा प्रश्न विरोधी पक्षातील उमेदवारांना विचारा.

Leave a Comment

error: Content is protected !!