रोहित पवार यांनी माझे नाव कुठे घेतले ते सांगा मग मला उत्तर देता येईल, माझी नियोजित वेळ 5 वाजताची होती मी 5 वाजून 10 मिनिटांनी तिथे पोहोचलो आणि पावणेसात-7 वाजता तिथून निघालो. माझी भेट 3 दिवस आधीच ठरली होती कारण मी रायगड तर अजित पवार पुणे दौऱ्यावर होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, 2014 आणि 2019 पासूनच भाजपसोबत सत्तेत असावे ही अजितदादांची अधिकृत भूमिका होती. त्यानुसार शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या मूळ विचारधारेसह आमचा एनडीएतील सहभाग कायम आहे. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रिपदी निवड कोणत्याही दबावाखाली नसून पूर्णतः पक्षीय सहमतीनेच झाली आहे. ..ती दादांची भूमिका होती सुनील तटकरे म्हणाले की, 2014 पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्तेत असावे, अशी अजित पवारांची स्पष्ट भूमिका होती. ती त्यांनी पक्षाच्या सर्व अंतर्गत बैठकींमध्ये मांडली होती. 2019 चा पहाटेचा शपथविधी हा त्याचाच भाग होता. तीन पक्षांच्या खिचडी सरकारपेक्षा दोन पक्षांचे (भाजप-राष्ट्रवादी) सरकार महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेईल. राष्ट्रवादीने आवाज उठवावा विकास लवांडे म्हणाले की, अजित पवारांचा हा अपघात नाही हे चित्र स्पष्ट होत असताना त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यावर गप्प का बसले आहेत? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांची सखोल चौकशी झाली पाहिजे. अजित पवार यांच्या पक्षाने हिंमत दाखवून आवाज उठवण्याची गरज आहे तो आवाज तुम्ही का उठवत नाही? भाजपला अस्वस्थ होण्याची गरज काय? असा सवाल ही त्यांनी केला आहे. ..तर आज राष्ट्रवादी एकत्र झाली असती अंकुश काकडे म्हणाले की, अजित पवार आम्हाला म्हणाले होते की फार ताणाताणी करु नका लवकरच आपण एकत्र होणार आहोत. विलीनीकरणाबाबत कुठे माशी शिंकली माहिती नाही. पण 12 तारखेलाच हे होणार होते. त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगितले होते की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर 7-8 तारखेला याबद्दल जाहीर बोलण्यात येणार होते. पण ती तारीख अजित पवारांना सोयीची नसल्याने 12 तारीख ठरली होती. आज जर दादा असते तर चांगला निर्णय झाला असता. भविष्यात काय होईल याबद्दल मला काही माहिती नाही. शरद पवार यांनी देखील ही तारीख सांगितली होती, त्यामुळे आपण सर्व जण या तारखेची वाट पाहत होतो.
रोहित पवारांनी माझे नाव कुठे घेतले?:दादांशी भेट ठरलेलीच होती, फक्त 10 मिनिटं उशीर- तटकरे, भाजप अस्वस्थ का? NCP गप्प का- लवांडे
-
By सुरेश पाचभाई
- February 12, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
झरपट येथे राष्ट्रसंतांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचा महापूर
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 30, 2026
वन्य प्राण्यांची तहान पाणवठ्यांवर:१९ पाणवठ्यांमध्ये भरले जात...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 30, 2026
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी?:समन्स देणे...
9views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 29, 2026
