Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट:मनोज जरांगे पाटील यांचा आरोप; आता सातारा गॅझेटिअरसाठी लढणार

मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शिवजयंती 2026 च्या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप करत वातावरण ढवळून काढले. मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जातोय, सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा थेट दावा त्यांनी केला. या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. जरांगे यांनी सांगितले की, काही जणांकडून त्यांच्या विरोधात मुद्दाम बोलून घेतले जात आहे, तरीही माझ्यासोबत मायबाप जनता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माचनूर आणि मंगळवेढ्यातील त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या या भेटीत मार्गभर मराठा बांधवांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमात बोलताना त्यांनी समाजाला व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला. व्यसनापासून दूर राहा आणि शेतात भरपूर काम करा, असे आवाहन करत त्यांनी समाजजीवन आणि कष्टाचे महत्त्व अधोरेखित केले. आरक्षणाची लढाई लढताना समाजाने आपली ताकद संघटितपणे दाखवावी, असे ते म्हणाले. राजकारण केवळ निवडणुकीपुरते करा, नंतर शेतात लक्ष द्या, असा संदेश देत जरांगे यांनी पालकांना मुलांच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. पोरा-बाळांना अधिकारी करा. आपली मुलं मोठ्या पदावर गेली तर पुढील पन्नास वर्षांची चिंता संपेल, असे सांगताना त्यांनी स्वावलंबनाचा मुद्दा मांडला. सही घेण्यासाठी कोणाच्या दारात उभे राहावे लागणार नाही, असे ते म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, ही लढाई कोणत्याही एका पक्षासाठी नसून सर्व पक्षांतील मराठा समाजासाठी आहे. दरम्यान, सरकारला इशारा देताना त्यांनी म्हटले की, आरक्षण दिले नाही तर एकेका व्यक्तीला पाहून घेऊ. त्यांच्या या वक्तव्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळाले. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितले की, काही लोकांना मुद्दाम त्यांच्या विरोधात उभे केले जात आहे. तरीही जनतेचा पाठिंबा असल्याने आपल्याला काही होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील आरक्षणाच्या संदर्भात जरांगे यांनी सातारा, मिरज आणि कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटिअरचा मुद्दा पुढे आणला. पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पुढील महिन्यात सोलापूर येथे याबाबत पहिली बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये 15 लाख नोंदी असल्याचे सांगत, त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 42 लाख मराठा समाजाला होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. या नोंदींच्या आधारे आरक्षणाचा मार्ग सुकर होईल, असे ते म्हणाले. गॅझेटिअरची अंमलबजावणी हा त्यांच्या पुढील आंदोलनाचा प्रमुख मुद्दा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजाला संघटित राहण्याचा संदेश यासोबतच सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. या संस्थांबाबत प्रश्न निर्माण झाल्यास त्यावरही आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. एकूणच, माचनूरच्या व्यासपीठावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवे टोक देत समाजाला संघटित राहण्याचे आणि सरकारला ठोस पावले उचलण्याचे स्पष्ट संदेश दिले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!