Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

छत्रपती संभाजीनगर मनपात गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे?:एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णयासाठी आज नंदनवनवर बैठक

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांची महत्त्वाची बैठक आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘नंदनवन’ निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत महापालिकेच्या गटनेत्याच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे चित्र आहे. महापालिकेतील गटनेता कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. गटनेत्याचे नाव उपमुख्यमंत्री शिंदे जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्र्यंबक तुपे यांचे नाव सुचवून वरिष्ठ पातळीवर सहमती मिळवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या गटाकडून किशोर नागरे यांचे नाव पुढे आल्याने पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी पक्ष निरीक्षकांनी नगरसेवकांकडून कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या; मात्र गटनेत्याचे नाव अद्याप जाहीर झाले नसल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दोन गटांतील संघर्षामुळे काही नगरसेवकांनी या वादात पडण्यास नकार दिला असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील गटबाजी स्पष्ट गटनेता निवडीवरून दोन गटांमध्ये मतभेद असल्याने एकमत होत नव्हते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल तसेच शिवसेनेचे निरीक्षक विलास पारकर उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट हे केज येथे असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नव्हते. बैठकीदरम्यान नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आणि गटनेतेपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही नगरसेवकांनी ‘आम्हाला गृहीत धरू नका’ अशी भूमिका मांडत उपमहापौर निवडीवेळीही अशीच बैठक व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. शिरसाट–जंजाळ वादाचा परिणाम पालकमंत्री शिरसाट आणि जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्यातील वाद मनपा निवडणुकीपूर्वीपासूनच सुरू असून निवडणुकीनंतरही तो कायम आहे. या अंतर्गत संघर्षाचा परिणाम गटनेता निवडीवर होत असल्याचे मानले जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पक्षाला मुंबईहून निरीक्षक पाठवावा लागला. निरीक्षकांनी सर्वांना एकत्र बसवून नगरसेवकांच्या थेट स्वाक्षऱ्या घेतल्या. म्हणून कमी नगरसेवक दिव्य मराठीशी बोलताना राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले की, अंतर्गत वादामुळे पक्षाला केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. मला पराभूत करण्यासाठी माझ्याच विरोधात उमेदवार उभे करण्यात आले. यात अंतर्गत कोण होते, हे सर्वांना माहिती आहे. तरीही मी माझे अस्तित्व सिद्ध केले. हिंदू नगरसेवकांमध्ये मी तिसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलो, असे ते म्हणाले. तसेच पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्याचा उल्लेख करत, मी मुख्यमंत्री नाही; मात्र पालकमंत्री नक्की होईल, असा टोला त्यांनी लगावला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!